Skip to main content

स्ट्रोकने पिडीत रुग्णांना मिळणार ‘गोल्डन अवर‘ मध्ये उपचार

स्ट्रोकने पिडीत रुग्णांना मिळणार ‘गोल्डन अवर‘ मध्ये उपचार

खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ

नवी मुंबई (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे): बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अलीकडच्या काळात ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. स्ट्रोक म्हणजे पक्षाघात , याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. जेव्हा मेंदूमध्ये एखादी नस ब्लॉक होते, तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे; ज्यावर वेळीच उपचार केला नाही, तर मृत्यूही होऊ शकतो. यावर योग्य वेळी उपचार केल्यास रक्तवाहिनी मधील अडथळा दूर केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊशकतो. परंतु त्यासाठी मेंदूच्या पेशी मृत होण्याआधीच जलद उपचार मिळणे अत्यंत गरजेचे आणि लक्षात घेऊन नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलने स्ट्रोक युनिटला सुरूवात केली आहे. या शुभारंभ प्रसंगी नवी मुंबईचे आयपीएस आणि सहपोलीस आयुक्त श्री संजय येनपुरे उपस्थित होते. 

या युनिटमध्ये सीटी-एमआरआय चाचणी, थ्रोम्बोलिसिस आणि थ्रोम्बेक्टॉमी सारखी प्रगत तंत्रज्ञान, न्यूरो-आयसीयू आणि अनुभवी डॉक्टर आणि परिचारिकांची टीम यांचा समावेश आहे. नवी मुंबई, मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरात राहणाऱ्या रुग्णांना या सुविधेचा नक्कीच फायदा होईल.

मेंदूच्या एखाद्या भागात रक्त प्रवाहत अडथळा आल्यावर इस्केमिक स्ट्रोकतर मेंदूतील रक्तवाहिनी फुटली की हेमोरेजिक स्ट्रोक येतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॅाल, धूम्रपान, लठ्ठपणा, हृदयरोग आणि बैठी जीवनशैली ही स्ट्रोकची प्रमुख कारणं आहेत.

नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसायन्ससचे संचालक डॉ. पवन ओझा सांगतात की, स्ट्रोकच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अचानक अशक्तपणा किंवा सुन्नपणा (बहुतेकदा शरीराच्या एका बाजूला), बोलण्यात किंवा समजण्यात अडचणी, दृष्टी समस्या, चक्कर येणे किंवा अचानक तीव्र डोकेदुखी यांचा समावेश होतो. सांकेतिक भाषेत स्ट्रोकच्या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. याचा अर्थ (बॅलेन्स - संतुलन कमी होणे, आईज- दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, फेस- चेहऱ्याचा काही भाग क्षीण होणे, आर्म- हात कमकुवत होणे, स्पीच- बोलण्यात अडचणी आणि टाईम- वेळ). 

डॉ. ओझा पुढे सांगतात की, भारतात स्ट्रोक हे मृत्यू आणि अपंगत्वाचे एक प्रमुख कारण ठरत आहे. बऱ्याचदा पक्षाघाताच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते किंवा त्यांना अशक्तपणा किंवा थकवा समजून त्यावर वेळीच उरचार केले जात नाही. यामुळे मृत्यू ओढवू शकतो किंवा अर्धांगवायू, बोलण्यात अडचणी येणे किंवा दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागू शकते. या युनिटच्या माध्यमातून केवळ उपचार न पुरविता समाजामध्ये याबाबत जागरूकता वाढवणे, वेळीच उपचार सुरू करणे आणि रुग्णांना जीवनाची नवी संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. वेळीच उपचार केल्याने केवळ एखादयाचा जीव वाचत नाहीत तर त्याच्या जीवनाची गुणवत्ता देखील सुधारता येते.

मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख संदीप जोशी सांगतात की, या नवीन स्ट्रोक युनिटद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तमोत्तम रुग्ण सेवा पुरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला जाणार आहे. याठिकाणी रुग्णांना त्वरित आणि प्रभावी उपचार मिळावेत याची खात्री केली जाईल.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...