Skip to main content

प्रितम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा संपन्न

प्रितम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा संपन्न:

पनवेल (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे) : गणेशोत्सवाची पर्वणी म्हणजे भक्ती, उत्साहात, एकोपा आणि आनंदाचा महापर्व. त्याचाच भाग म्हणून ओंकार मित्र मंडळ, प्रभू आळी, पनवेल आयोजित ३५ वा गणेश आगमन सोहळा शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता दिमाखदार व भक्तिरसात संपन्न झाला.

यंदा मंडळाने बाप्पाचे श्रीकृष्णस्वरूपातील आगमन करून पनवेलकरांसाठी खास आकर्षण निर्माण केले. संपूर्ण प्रभू आळी परिसर फुलांच्या सजावटीने, रोषणाईने व ढोल-ताशांच्या गजराने नटला होता. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. या आगमन सोहळ्यास मंडळाचे आधारस्तंभ प्रितमदादा म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे मंडळ समाजकार्य आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असून, पनवेलमध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबर समाजसेवेचा संदेश देत आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवक यांच्या  कुशल नियोजनामुळे सोहळा यशस्वीरीत्या पार पडला महिला मंडळ व सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा मागील ३५ वर्षांपासून ओंकार मित्र मंडळ धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक कार्यालाही प्राधान्य देते. बाप्पासाठी हार-फुलं न आणता “एक वही – एक पेन” ही संकल्पना राबवली जाते. जमा झालेली शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दिली जातात. दरवर्षी अनाथाश्रमांना भेट देऊन अन्नदान करण्याचा उपक्रमही राबवला जातो. प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम व इतर सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष निखिल राम फडतरे यांनी दिली. या मंगलमय सोहळ्यात श्री.प्रितम म्हात्रे यांनी सपत्नीक सौ. ममता म्हात्रे यांच्यासह उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले.
प्रितम जनार्दन म्हात्रे (मा.विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका):
३५ वर्षांचा अखंड प्रवासात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ओंकार मित्र मंडळ, प्रभू आळी हे पनवेलमधील एक आदर्श मंडळ ठरले आहे. भक्ती, संस्कार, समाजकार्य आणि उत्सव यांचा सुंदर संगम साधत लोकांना एकत्र आणण्याचे कार्य या मंडळाने सातत्याने केले आहे.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...