Skip to main content

ट्रान्समिशन प्रोजेक्ट जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

ट्रान्समिशन प्रोजेक्ट जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार 

प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचे दिले निर्देश

पालघर (प्रतिनिधी): वीज पारेषण व वितरण क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन करण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस असून राज्याला आणि देशाला ऊर्जा सक्षम बनवण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हयात विविध अति उच्चदाब वीज वाहिन्या उभारण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्याभरात सुरू असलेल्या विविध ट्रान्समिशन प्रोजेक्ट कामकाजाचा आढावा नुकताच पालघर जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या वतीने घेण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी सर्व संबंधित वरिष्ठ शासकीय अधिकारी, शासकीय यंत्रणा व प्रकल्पसंस्था समवेत घेऊन संबंधित विभागांना या प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचे निर्देश दिले.

सदर बैठकीस महसूल विभागासोबतच वनविभाग, भूमिअभिलेख, कृषी, आणि पोलीस इत्यादी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि इतर यंत्रणांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचा उद्देश हा प्रकल्पांच्या उभारणीचा आढावा घेऊन कामकाजातील उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे, तसेच विविध यंत्रणांशी समन्वय साधणे हा होता.

प्रकल्पांच्या कामकाजाला गती देण्यासाठी, जिल्हाधिकारी पालघर डॉ. इंदू राणी जाखड यांनी भू-सर्वेक्षणाचे व जमीन मोजणीचे काम तात्काळ पुर्ण करणे, जमिनीच्या मोबदल्याचे दर निश्चित करणे, तसेच वनहक्क कायदयानुसार (FRA) प्रमाणपत्रास मंजुरी तात्काळ देण्याचे महत्व अधोरेखित केले. एक अभिनव उपक्रम म्हणून, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व वीज प्रसारण प्रकल्पांच्या समन्वयासाठी श्री. तेजस चव्हाण, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली असून ते या प्रकल्पांशी संबंधित सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांशी समन्वय साधतील. तसेच सर्व संबंधित यंत्रणांशी संवाद साधून अडचणींचे वेळेवर निराकरण करण्याची कामे देखील करतील.

राज्यबाहेरील वीजनिर्मिती प्रकल्पांतून हरित ऊर्जा आयात करण्यासाठी महाराष्ट्रात उच्च-दाब वीज प्रसारण लाईन उभारण्यावर विशेष भर दिला जात आहे. नवीकरणीय ऊर्जेला चालना देणे हे राज्याच्या ऊर्जा धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असून, स्वच्छ ऊर्जेचा वाटा वाढवणे, हवामान बदलाचे धोके कमी करणे आणि अंतिमतः ग्राहकांसाठी वीज दर कमी करणे यावर भर दिला जात आहे.

अति उच्चदाब वीज वाहक यंत्रणा उभारत असता ज्यांच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे. त्यांना समाधानकारक मोबदला देण्याची तजवीज देखील केली जाते. इतकेच नव्हे तर सदरहू जमिनींचे सातबारा हे जमीन मालकांच्याच नावावरती राहतात. उच्चविज वाहक तारा आणि टॉवर खाली जमीन मालक पारंपारिक शेती व्यवसाय देखील करू शकतात. 

आमच्या शेत जमिनीमध्ये हाय व्होल्टेज पॉवर लाईन चा टॉवर उभारलेला आहे. परंतु आम्ही त्याच्या खाली बिनधास्तपणे शेती करत आहोत. टॉवर खाली आमचा ट्रॅक्टर व्यवस्थित रित्या फिरवून जमिनीची मशागत होते. हाय व्हल्टेज लाईन मधून कुठल्याही स्वरूपाचा आवाज येत नाही की आम्हाला कुठल्याही स्वरूपाचा त्रास होत नाही. आमच्या जमिनीवर टावर पडला असला तरी देखील सातबारा उतारा आमच्याच नावावर आहे.

अर्चना भोईर - भूधारक,विक्रमगड.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...