Skip to main content

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना मिळणार रोजगारक्षम शिक्षणाची संधी

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना मिळणार रोजगारक्षम शिक्षणाची संधी 

मुंबई (प्रतिनिधी): देशातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण प्रदान करणे ही काळाची गरज असल्याचे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या वतीने एका अभिनव योजनेचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रोजगार हमी देणारे शैक्षणिक कोर्स प्रदान करण्यात येतात.इंटर्नशिप असल्यामुळे लाभार्थींना शिक्षणादरम्यान एकत्रित भत्ता तसेच मानधन देखील देण्यात येते. याच योजनेच्या अंतर्गत खावडा ४ पार्ट सी ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर) यांच्या वतीने कार्यान्वित असणाऱ्या ऊर्जा पारेषण प्रकल्पांमध्ये पाच लाभार्थ्यांना सामावून घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर इच्छुक लाभार्थ्यांनी लॉगिन करून सर्वप्रथम रजिस्टर करावयाचे आहे. त्यानंतर स्वतःचा आधार कार्डशी संलग्न असणारा मोबाईल नंबर व्हेरिफाय करायचा आहे. ही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर इच्छुक लाभार्थ्यांनी समोर दिसणाऱ्या रकान्यांमध्ये त्यांची माहिती भरायची आहे. त्यानंतर मार्कलिस्ट आणि प्रमाणपत्र ब्राउझ करून अपलोड करायची आहेत. सरते शेवटी या सगळ्याचे कन्फर्मेशन पूर्ण झाल्यानंतर त्याची एक कॉपी काढून इच्छुक लाभार्थी आपल्यापाशी ठेवू शकतात.

याच संकेतस्थळावर लाभार्थी होण्यासाठीचे निकष आणि नियम देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे या योजनेमध्ये सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून प्रत्येक महिन्यासाठी पाच हजार रुपये स्टायपेंड देण्यात येतो. तर एकत्रित भत्ता म्हणून ६ हजार रुपये देण्याची तजवीज देखील या अभ्यासक्रमात आहे. देशातील सर्वोत्तम अशा आस्थापनांबरोबर काम करायची संधी मिळाल्याने लाभार्थी विद्यार्थ्यांना अनुभवाची एक भक्कम शिदोरी आयुष्यभरासाठी मिळते. या योजनेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...