Skip to main content

Posts

Showing posts from February, 2025

महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन- कामगारांच्या हक्काच्या लढ्यासाठी देशातील सर्व केंद्रीय संघटनांनी एकत्रतीत याव्यात

महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन- कामगारांच्या हक्काच्या लढ्यासाठी देशातील सर्व केंद्रीय संघटनांनी एकत्रतीत याव्यात.... मुंबई (प्रतिनिधि): न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटना (NMKG) गेल्या २० वर्षांपासून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहे. जागतिक पातळीवरील शिपिंग कंपनी मर्क्स, डी. पी. वर्ल्ड, पीएसए सिंगापूर, अदानी ग्रुप येथील कामगारांना संघटित करून सेवा-शर्तींच्या अधिन राहून चांगले वेतनवाढीचे करार केलेले आहेत. भारतातील आयटीएफ सलग्न सर्व संघटनांनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रात कामगारांना संघटित करावे त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास, आयटीएफची पूर्ण ताकद कामगारांच्या मागे लावण्यास मी आयटीएफ या बहुराष्ट्रीय संघाचा एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणूनआपणांस आश्वासित करत आहे असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले. मुंबई येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हाॅटेलमध्ये झालेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) संघटनेच्या संलग्न संघटनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आयटीएफचे जनरल सेक्रेटरी स्टिफन काॅटन, एनयूएसआयचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदाळगावकर,एमयूआयचे कॅप्टन प्रध...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.