Skip to main content

पाणीपुरवठा बाबतीत प्रितम म्हात्रे आक्रमक.. "पायोनियर मधील जलकुंभाची केली पाहणी"

पाणीपुरवठा बाबतीत प्रितम म्हात्रे आक्रमक.. "पायोनियर मधील जलकुंभाची केली पाहणी"

पनवेल (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): उन्हाळ्यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी पाणीटंचाई होती. परंतु पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले तरीसुद्धा पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे काही परिसरात नागरिकांना आजही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी काही जागृत लोकप्रतिनिधी कार्यकाळ संपला असताना सुद्धा विविध नागरी समस्यांचा सतत पाठपुरावा घेत असतात. याचाच प्रत्यय आज पनवेल मधील पायोनियर मधील नागरिकांना आला.

पायोनियर विभाग येथे नवीन जलकुंभाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी अद्याप जोडणीचे काम झाले नाही. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे करत होते.आज अखेरीस त्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन या टाकीची पाहणी केली असता त्यांना तेथे अनेक त्रुटी आढळल्या. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाला केबिन नाही,तसेच पाईप लाईन जोडणीचे काम पूर्ण झाले नाही. कारण की नव्याने केलेल्या रस्त्यात सिमेंट काँक्रीटकरण झाल्यामुळे तेथे ब्रेकिंग करून पुन्हा तिथे काम करावे लागणार. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना यावेळी संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल त्यांनी जाब विचारला. 

तसेच, तेथील उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रितम म्हात्रे यांना पुढील दोन दिवसात जोडणी करून लवकरच या जलकुंभावरून पायोनियर परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासोबत मा. नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, मा.नगरसेविका सौ. प्रीती जॉर्ज, गणेश म्हात्रे, स्थानिक सोसायटीमधील पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. 

प्रितम म्हात्रे (मा.विरोधी पक्षनेते)-

व्याने जलकुंभ बांधून वर्ष उलटला. तो सुरू करण्यासाठी मी सतत पाठपुरावा करतोय. जलकुंभाला मारलेला कलर सुद्धा शेवाळ लागून पुन्हा करायची वेळ आली परंतु अजून पाणीपुरवठा सुरू झाला नाही याबाबतीत आज पाहणी करून अधिकाऱ्यांना जाब विचारून पुढील काही दिवसातच नियोजित पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे असे सांगितले अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्य पद्धतीत आम्ही तो सुरू करून घेऊ.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...