Skip to main content

महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालय आणि कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शासकीय सहलीच्या आयोजन:

महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालय आणि कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शासकीय सहलीच्या आयोजन:

महाड (प्रतिनिधी) :-

महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालय आणि कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्किट टूर या शीर्षकाखाली महाड चवदार येथे एक दिवसीय शासकीय सहलीच्या आयोजन करण्यात आले. 20 मार्च 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांसाठी खुले करण्यात यावे यासाठी येथे पाण्याचा सत्याग्रह करून हा तलाव तमाम अस्पृश्य जनतेसाठी खुला करून दिला.

तसेच, प्रसंगी अनेक संकटांचा सामना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायान समवेत हा लढा देऊन हा सत्याग्रह केला होता. याच इतिहासाची पुन्हा एकदा सर्वांना आठवण  करून देण्यात यावी व डॉ बाबासाहेबांच्या या सर्वांगीण कार्याचा जनमानसात प्रचार प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा जनहिता चा उपक्रम राबवला आणि याच्या जोडीने महाडला जाताना जी ऐतिहासिक गांधारपाले बौद्ध लेणी सुद्धा आहे या लेणीची सुद्धा नागरिकांना सफर करून देण्यात आली. 26 नोव्हेंबर संविधान गौरव दिनापासून सुरुवात झालेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्किट टूर या संकल्पनेची जनतेमध्ये चर्चा व उत्सुकता वाढलेली आहे. 

या उपक्रमांतर्गत अनेक प्रतिष्ठित व्यक्ती समाजसेवक उद्योजक शासकीय प्रशासकीय आजी-माजी अधिकारी व शालेय विद्यार्थी यांनी यात भाग घेतला प्रसंगी उच्च विद्या विभूषित हवी मुंबईतील प्रसिद्ध दंतशिक्षक डेंटल असोसिएशनचे सल्लागार डॉक्टर सुदर्शन रणपिसे , महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक यादव, झेन फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब जाधव , उद्योजक गौतम अहिरे सुनिता अहिरे, एमटीएनएलचे अधिकारी संजय साळे, मुंबईचे माजी तहसीलदार आयु तांबे व अनेक महिला व पुरुषांनी या सहलीत भाग घेतला व त्याचप्रमाणे डॉक्टर सुदर्शन यांनी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि दादासाहेब जाधव यांनी सहलीचा दर्जा सुधारण्याबाबत सूचना मांडल्या.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...