Skip to main content

APMC फ्रुट बाजारात अग्नितांडव..!!

APMC फ्रुट बाजारात अग्नितांडव..!!

* दोन कामगार जखमी 

* आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला लागले तबबल २ तास

नवी मुंबई (प्रतिनिधी) :

नवी मुंबईत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ बाजारात सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास अचानक एन एन विंग मध्ये आग लागली. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुठ्ठे, बॉक्स, इत्यादी जळाऊ वस्तू होत्या. त्यामुळे बघता बघता क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ४ वाजून ३६ मिनिटांनी अग्निशमन दल बाजारात दाखल झाले. वाशी आणि नेरुळ येथील अग्निशमन दलाच्या ६ ते ७ अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचल्या. मोठ्या प्रमाणात जळाऊ खोके असल्याने आगीचे लोळ लांबपर्यंत पोचले . त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागले आहेत. त्यामध्येच बघ्यांनी गर्दी केल्याने आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवून चारही बाजूने पाण्याचा फवारा केल्याने आग आटोक्यात आली. मात्र तबबल दोन ते अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. साधारणतः २५-३० गाळ्यांना आगीची झळ बसली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारातील एन विंग मध्ये गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. पुठ्ठे ,बॉक्स इत्यादी वस्तूंनी पेट घेतल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जवळजवळ १५ ते २० गाळे आगीच्या भक्षस्थानी सापडले. आग लागताच गाळ्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे दोन कामगारांनी पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने पायाला दुखापत होऊन जखमी झाले असून त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलानी तब्बल २ ते अडीच तास अथक प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यास यश प्राप्त झाले आहे. परंतु या आगीच्या घटनेने पुन्हा एकदा एपीएमसी बाजार समितीतील अनधिकृत वापर आणि अग्नि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


आग कशामुळे लागलेली आहे हे स्पष्ट झाले नसून प्रथम दर्शनी तेथे मोठ्या प्रमाणात पुठ्ठे होते त्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...