Skip to main content

नवी मुंबईची "शान" आ. गणेश नाईक:

नवी मुंबईची "शान" आ. गणेश नाईक:

नवी मुंबई :- देशातील पहिली ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नावारुपाला आलेले शहर म्हणजे नवी मुंबई. मुंबई वसवण्यात परकीयांचा बराच वाटा होता. मात्र, नवी मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजनबद्ध शहर हे भारतीय व्यक्तींच्या दूरदृष्टीतून साकारलेले आहे. नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासात आ. गणेश नाईक यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या नेतृत्वात गेली तीन दशके नवी मुंबईत विकासाची पताका फडकावली जात आहे. गणेश नाईक यांच्या कार्यातून नवी मुंबईचा चौफेर विकास साकारला आहे. गणेश नाईक यांची ओळख शून्यातून जग निर्माण करण्याची किमया साधणारे नवी मुंबईचे शिल्पकार अशी असून त्यांचे जीवनचरित्र तमाम जनतेला स्फूर्ती देणारे आहे.

गणेश नाईक यांचा जन्म दि. १५ सप्टेंबर, १९५० रोजी झाला. त्यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती. इतरांच्या मदतीला धावून जाणार्‍या आणि मनमिळावू स्वभावामुळे ते अल्पावधीत सर्वांमध्ये लोकप्रिय झाले. जिद्द, कामाची चिकाटी, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि काम करण्याची प्रचंड ऊर्जा यामुळे त्यांनी शून्यातून गरुडझेप घेतली. बोनकोडे, कोपरखैरणे या छोट्यांशा गावातून आमदार, कार्यक्षम कॅबिनेट मंत्री, कार्यक्षम पालकमंत्री आदी पदांपर्यंतची त्यांची वाटचाल निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारी आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीला सुवर्णसंधी समजून त्यांनी संधीचे सोने केले. जे काही करायचे, ते उत्तम दर्जेदार आणि भव्य दिव्य करायचे ही गणेश नाईक यांची कामाची ‘स्टाईल’ आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ नवी मुंबईकरांच्या प्रेमाने, सहकार्याने गणेश नाईक सार्वजनिक जीवनात मोठ्या विश्वासाने कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील कोणतीही गोष्ट असो ती नंबर एकच होणार, हे नवी मुंबईकर पाहत आले आहेत. गणेश नाईक यांच्या नेतृत्वातील नवी मुंबई महानगरपालिकेने चांगल्या कामगिरीने देशातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले आहेत.

गणेश नाईक यांचे आदर्श, ‘व्हिजन’ घेऊन वाटचाल करणार्‍या नवी मुंबईची ओळख ‘विकसित नगरी’ म्हणून देशाला आहे. नवी मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शहराच्या परिपूर्ण विकासासाठी लोककल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नवी मुंबईला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आजपर्यंत दोन हजारांहून अधिक ‘जनता दरबार’ भरवून सामान्य नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडविण्याचे काम गणेश नाईक यांनी केले आहे. हाच जनता दरबार सर्वसामान्य जनतेचा आधार ठरला आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटांपर्यंत घरे असलेल्या रहिवाशांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अपारंपरिक ऊर्जा विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या दोन विभागांचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना गणेश नाईक यांनी या खात्यांचा कारभार गतिमान आणि गुणवत्तापूर्ण करून लोकाभिमुख केला.

गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पायाभूत सोयीसुविधा नवी मुंबईत मिळाल्यामुळे शहराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमातून नवी मुंबईच्या हिरवाईत भर घातली आहे. नवी मुंबई शहर महाराष्ट्राचे एक शैक्षणिक केंद्र म्हणून उदयाला आले आहे. महानगरपालिका आणि खासगी शाळांमधील गुणवत्ता वाढावी म्हणून बोर्डाच्या धर्तीवर ‘एसएससी सराव परीक्षे’चे दरवर्षी आयोजन केले जाते. यात १२ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि ५० हून अधिक शाळांचा सहभाग असतो. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन दरवर्षी केले जाते. विद्यार्थ्यांना मोफत दाखले वाटप आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या करिअरला गणेश नाईक यांनी साथ दिली आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध कंपन्यांना एकाच मंचावर आणून त्यांनी भव्य ‘रोजगार मेळाव्या’चे आयोजन केले. नवी मुंबई हे एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून जगभरात नावाजले आहे. या लौकिकाप्रमाणेच शहरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, यासाठी ‘मिनी ऑलिम्पिक’ दर्जाचा ‘नवी मुंबई क्रीडा महोत्सव’ २० वर्षांपासून दरवर्षी आयोजित केला जातो. नवी मुंबईचे सांस्कृतिक वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक यांनी आपल्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम पायाभूत सोयी-सुविधा देऊन नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवले आहे. त्यातील काही ठळक कामे म्हणजे, पुढील ५० वर्षांचा विचार करून नवी मुंबईला अत्यावश्यक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी मोरबे धरण घेतले. मुंबईच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील धरणानंतर स्वतःच्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. आशिया खंडातील पहिल्या हरित महानगरपालिका भवनची निर्मिती, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात २२५ फूट उंचीच्या आणि २४ तास सदैव फडकणार्‍या राष्ट्रध्वजाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. नवी मुंबईचे ‘लॅण्ड मार्क’ म्हणून ओळख ठरलेल्या ‘वंडर्स पार्क’ची निर्मिती केली. नवी मुंबईमध्ये २०० हून अधिक उद्याने असून ‘उद्यानांचे शहर’ म्हणून ओळख निर्माण झाली.

सांडपाण्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणारी ‘सी-टेक’ ही अत्याधुनिक तंत्र राबवणारी अग्रगण्य महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिका ओळखली जाते. त्यासाठी सहा मलनिस्सारण व्यवस्थापन केंद्रे उभारली आहेत. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान, महाराष्ट्र शासनाने सुरू केल्यावर राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाला. घनकचरा व्यवस्थापन उत्तम दर्जाचे केले जाते. अत्याधुनिक पद्धतीने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. रस्ते हा शहराचा आरसा समजून शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. नवी मुंबईचा ‘क्वीन्स नेकलेस’ अशी ओळख असणार्‍या ‘पाम बीच मार्गा’वर सौंदर्यात भर घातली. सीबीडी बेलापूर येथील सेक्टर १५ मध्ये आकर्षक रस्ते साकारले आहेत. बेलापूर येथे ‘कम्युनिटी सेंटर’ उभारले. महापे जंक्शन एलिव्हेटेड मार्ग पूर्ण केला आहे. ‘बेलापूर सी शोअर’, ‘एसटीपी केंद्र’, शहरात प्रशस्त मैदाने साकारली आहेत. एनएमएमटीमध्ये ‘व्होल्वो बस’, ‘ब्रांटो स्कायलिफ्ट कार’, ‘एपीएमसी केंद्र’, ‘डम्पिंग ग्राऊंड’, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, प्रशस्त ठाणे-बेलापूर मार्ग, शहर सुरक्षेच्या द़ृष्टीने तत्पर आणि कार्यक्षम अग्निशमन दल आदी कामे करुन नवी मुंबईकरांचे जीवनमान उंचावले आहे.




Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...