Skip to main content

न्यूज अपडेट: नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन थाटामाटात:

न्यूज अपडेट: नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन थाटामाटात:

● अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आयोजित तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सवाला खासदार कुमार केतकर यांची हजेरी

● आगरी कोळी महोत्सव 2022 नामदेव रामा भगत

उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी. माजी सिडको संचालक संस्थापक अध्यक्ष अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट

नेरुळ (प्रतिनिधि) :

अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आणि नगरसेवक नामदेव भगत यांच्या सहकार्याने नेरूळ येथील श्री गणेश रामलीला मैदानावर २३ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान भव्य आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवी मुंबई ऑयडॉल गीत गायन स्पर्धा, नवी मुंबई सुंदरी वेशभूषा स्पर्धा, लावणी स्पर्धा, आंतरशालेय नृत्यस्पर्धा, विविध गुणदर्शन, कोळी नृत्य, लावणी नृत्य, एकपात्री विनोदी नाट्य असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवाची रंगत वाढविणार आहेत. विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच आगरी-कोळी समाजाच्या ग्रामसंस्कृतीचा आकर्षक देखावा, संस्कृतीदर्शक चित्र प्रदर्शन, खाद्य संस्कृती, सुक्या मासळीचा बाजार, भव्य फनफेअर हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले. उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आगरी कोळी समाजातील लोकांचा पुरस्काराने देखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

येथील ग्रामसंस्कृती, लोककला व लोकपरंपरेचे जतन व्हावे, नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देतानाच जुन्या जाणत्या कलावंतांचा गुणगौरव व्हावा, ग्रामसंस्कृती आणि नागर संस्कृती यांच्यामध्ये वैचारिक आदान-प्रदान व्हावे, सांप्रदायिक एकता व एकात्मता वृद्धिंगत व्हावी, हाच उद्देश समोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 

यावेळी मोठ्या संख्येने नेरूळकरांनी उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घेतला. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे, त्याचबरोबर आगरी- कोळी पध्दतीचे खास जेवण दिल्ली कुलपी, पाणीपुरी, चायनीज आदि खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. महोत्सवात येणाऱ्यांसाठी साजश्रुंगार आणि घरगुती सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे, तसेच तरूणपिढीसह लहान मुलांना फुल- टू धम्माल करता यावी, यासाठी विविध प्रकारचे पाळणे, जादूची गुहा उभारण्यात आली असून यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

तर या महोत्सवामुळे आगरी - कोळी समाजाच्या परंपरा येथे राहणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकानाही कळाव्यात हा हेतू असून त्यानिमित्ताने समाजाची संस्कृती जतन केली जात आहे. यावेळी अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आयोजित तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सवाला खासदार कुमार केतकर तसेच या कार्यक्रमाचे आयोजक माजी सिडको संचालक नामदेव भगत, नगरसेविका इंदूमती भगत, स्माईल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धीरज आहूजा सौ. उमा आहूजा आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...