Skip to main content

धक्कादायक बातमी : बचपन का प्यार’ गाण्याने जगाच मन जिंकणाऱ्या सहदेवचा अपघात; डोक्याला गंभीर मार:

धक्कादायक बातमी : बचपन का प्यार’ गाण्याने जगाच मन जिंकणाऱ्या सहदेवचा अपघात; डोक्याला गंभीर मार:

"बचपन का प्यार’ या गाण्याने प्रसिद्ध झालेला छत्तीसगढ़ी मुलगा सहदेव दिरदो मंगळवारी २८ डिसेंबर रोजी एका अपघातात जखमी झाला आहे. हा अपघात शबरीनगर येथे झाला आहे. सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- सहदेव वडिलांसोबत दुचाकीवरून कुठेतरी जात होता. दुचाकीवर 3 जण होते. सहदेव मागे बसला होता ते शबरीनगरजवळ पोहोचले असता दुचाकी स्लीप झाली आणि सर्वजण खाली पडले. या अपघातात सहदेव गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरील अन्य दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. सहदेवला तातडीने सुकमा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्याला जगदलपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. सहदेवच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सुकमाचे जिल्हाधिकारी आणि एसपीही जिल्हा रुग्णालयात पोहोचले.

बादशाहने सहदेवच्या गाण्याचे रिमिक्स बनवले-

छत्तीसगडमधील सहदेवचे ‘बचपन का प्यार भूल नहीं जाना रे’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. नक्षलग्रस्त भागातील पेंडलनार शाळेत पाचवीत शिकत असताना २६ जानेवारीच्या तयारी दरम्यान सहदेवने हे गाणे गायले होते. त्याने शाळेत गायलेल्या या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवले आहेत. प्रसिद्ध रॅपर बादशाहनेही सहदेवच्या या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन तयार केले आहे. या व्हिडिओत सहदेवही बादशाहसोबत दिसला. याशिवाय सहदेवच्या या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी इंस्टाग्रामवर रिल्स तयार केले आहेत.

सीएमसोबत ही बर्‍याच वेळा दिसला -

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबतही तो अनेक वेळा दिसला आहे, यावरून सहदेवच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. मुख्यमंत्री बघेल यांच्यासोबतचा सहदेवचा एक व्हिडिओही खूप गाजला. या व्हिडिओमध्ये सहदेव म्हणतो की, ‘छत्तीसगडचे दोन लोक प्रसिद्ध आहेत. ‘एक हमर कक्का और एक हम.‘ तसेच दुसरीकडे या अपघातामुळे त्याचे चाहते चिंतेत पडले असून, तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.

https://twitter.com/nishatshamsi/status/1475841763218575362?t=ji-Ex0182YVLgQ88kEB7jw&s=19




महत्त्वाची टीप : आपले लसीकरण पूर्ण करून घ्या. तसेच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरी, बाहेर सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच  नियमित व्यायम करा आणि ओमायक्रॉन सारख्या विषाणू पासुन दोन हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...