Skip to main content

न्यूज अपडेट: अनुसूचित जमातीच्या मुलींना शिक्षणासाठी देण्यात येणारी “पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना” फक्त कागदावरच..!!

न्यूज अपडेट: अनुसूचित जमातीच्या मुलींना शिक्षणासाठी देण्यात येणारी “पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना” फक्त कागदावरच..!!

● वसतिगृहमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या मुलींना शिक्षणासाठी देण्यात येणारी “पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ” फक्त कागदावरच दिसत आहे.

पनवेल (प्रतिनिधी) :-  सदरील योजनेची सन 2020-2021 व सन 2021-22 या दोन्ही वर्षाच्या निधीचा लाभ विद्यार्थिनींना अद्याप झालेला नाही. वारंवार कार्यालयात चकरा मारून देखील कोणतीच भूमिका घेतली जात नाही. सतत चाल ढकल करून आठ दिवसात पैसे विद्यार्थिनीच्या खात्यात जमा होतील. आमचे प्रयत्न चालू आहेत अशा प्रकारची निरर्थक आश्वासने देण्यात आली आहेत. आज कॉलेज ऑफलाइन पद्धतीने सुरू होत आहेत. विद्यार्थिनींचे प्रॅक्टिकल चालू झाले आहेत. अशा परिस्थितीत डहाणू , जव्हार , विक्रमगड , मोखाडा , वाडा , तलासरी या भागात राहणाऱ्या विद्यार्थिनींना रोजचा प्रवास करून येणे कसे शक्य नाही. वसतिगृहात प्रवेश नाही शिवाय हक्काचा सहाय्यक निधी नाही. बाहेर रूम घेऊन राहायला या मुलींकडे पैसे नाहीत. मागासवर्गीयांनी शिक्षण घेऊच नये अशी यंत्रणा उभी केली जात आहे. आज आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह पनवेल येथे या मुली आंदोलनासाठी बसल्या आहेत तरीही अधिकारी निद्रिस्थ अवस्थेत आहेत.

एकीकडे शासन मुली शिकण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत असताना असे वातावरण पाहण्यात येते ही लाजिरवाणी गोष्ट म्हटली तर वावगे ठरणार नाही. सदर घटनेला वाचा फोडण्यासाठी आणि या योजनेचा लाभ संबंधित विद्यार्थिनींना मिळावा ह्यासाठी त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. अशी माहिती आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षा सविता शिंगडा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तसेच, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजाद समाज पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे, कोषाध्यक्षा राजश्रीताई अहिरे, रायगड जिल्हा महासचिव करूणाताई सोनवणे, पनवेल शहर अध्यक्षा विद्याताई जाधव, क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा रूपाली शिंदे, जनशक्ती संघटना महाराष्ट्रा राज्य नवी मुंबई अध्यक्षा विनिता बर्फे, ॲड. सिद्धार्थ इंगळे, आंबेडकर असोशियट्सचे आनंदराज घाडगे यावेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...