Skip to main content

T20 विश्वचषक अपडेट : आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात..!!

T20 विश्वचषक अपडेट : आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात..!!

नवी मुंबई (बातमी/दुबई) :- आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात होत आहे. पण वर्ल्डकपमधील सर्वात चुरशीची लढत ही २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या लढतीची उत्सुकता वाढत चालली असून काही चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानात जाऊन हा सामना पाहता येईल. तर अन्य कोट्यवधी चाहते टीव्हीवरून हा सामना पाहतील.

 भारत आणि पाकिस्तान ही लढत हायव्होल्टेज मानली जाते. दोन्ही देशातील चाहते याकडे युद्धाप्रमाणे पाहतात. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धच्या सर्व लढती जिंकल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या पाच लढतीत पाकिस्तानचा पराभव झाला असून टीम इंडिया यावेळी सहाव्या विजयासाठी उत्सुक असेल.

दोन्ही देशातील हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी चक्क 2 दिवसांची सुट्टी काढली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी पत्रकारांना सांगितले की, T-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी मी सुट्टी काढली आहे आणि स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहणार आहे. मॅच पाहण्यासाठी मी दुबईला जाणार आहे. यासाठी मी पंतप्रधान इमरान खान यांच्याकडून दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे. देवाकडे प्रार्थना आहे की पाकिस्तानला यश देओ. या सामन्याकडे खेळ म्हणून पाहावा. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक लढत पाहण्याची माझी इच्छा आहे. मग ती लढत कोलकातामध्ये असो किंवा चेन्नईमध्ये. या सामन्याचा जो निकाल होईल तो मान्य करावा.

भारताच्या साखळी फेरतील पाच पैकी 4 लढती या दुबईत होणार आहेत. तर एक लढत अबुधाबी येथे होईल.

भारताचे वेळापत्रक  -

२४ ऑक्टोबर- पाकिस्तानविरुद्ध, दुबई

३१ ऑक्टोबर- न्यूझीलंडविरुद्ध, दुबई

३ नोव्हेंबर - अफगाणिस्तानविरुद्ध, अबुधाबी

५ नोव्हेंबर- स्कॉटलंडविरुद्ध, दुबई

८ नोव्हेंबर- ग्रुप ए मधील दुसऱ्या संघाविरुद्ध









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि महत्त्वाचे आपली वेळ येताच कोविड वैक्सीन पूर्ण करून घ्या. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...