Skip to main content

ब्रोकिंग न्यूज :ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे आरोग्य समस्यांमध्ये झाली वाढ..!!

ब्रोकिंग न्यूज :ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे आरोग्य समस्यांमध्ये झाली वाढ..!!

● शाळा सुरु झाल्यामुळे  नागरिकांना सतावत आहे कोरोनाची चिंता

ठाणे (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरीही तिसऱ्या लाटेविषयी वैद्यकीय क्षेत्रातूनच नाही तर जगभरातून अनेक भाकिते वर्तवली जात आहेत . कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असाही दावा केला जात आहे परंतु याआधी आपल्याला ऑक्टोबरमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार आहे.  मुंबईतील तापमानाचा पारा वर चढत असून उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण होत आहेत. लोक काम धंद्यानिमित्त बाहेर असोत की, की घरात पंख्याखाली असोत, वाढत्या उकाड्यामुळे त्यांचा जीव कासावीस होत आहे. त्यामुळे ‘नको हा उन्हाळा बरा होता पावसाळा " असे म्हणण्याची पाळी आली आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात तापलेली मुंबई आणि त्यानंतर आलेल्या पावसाच्या सरी या वातावरणामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे.

महानगरपालिकेच्या रुग्णालयात ताप, डेंग्यू, मलेरिया तसेच पोटदुखीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या आधीच्या पंधरवडय़ापेक्षा अधिक आहे. त्यातच डेंग्यूची साथ कमी होत नसून या महिन्यात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. शाळा सुरु झाल्यामुळे  अनेक नागरिकाना आपल्या मुलांना कोरोना तर होणार नाही ना याची चिंता वाटत आहे.  याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व जेष्ठ फिजिशियनव व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ म्हणाले, " ऑक्टोबरमध्ये पाऊस पडणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला असला तरीही ऑक्टोबर हिटचा सामना आपल्या सर्वाना करावा लागत आहे. ऑक्टोबर हा रोगराई पसरण्याचा महिना मानला जातो कारण पाऊस कमी झालेला असतो व थंडीच्या आगमनाची चाहूल लागलेली असते.

आकाशातुन सूर्याची किरणे सरळ धरतीवर येतात, आकाशात ढग नसल्यामुळे हि किरणे  जी उष्णता वाढवतात त्यालाच  ऑक्टोबर हिट असे म्हटले जाते. मुंबई व जवळच्या शहरांमध्ये  हा महिना उष्णतेच्या बाबतीत अगदी त्रासदायक समजला जातो जेष्ठ नागरिकांना व लहान मुलांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागतो. जेष्ठ नागरिक व लहान मुलांची प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळे त्याना चक्कर येणे, लघवीचा त्रास तसेच अस्वस्थ वाटणे असे त्रास होऊ शक्तात  तसेच फिरतीची कामे करणाऱ्या नागरिकाना  या वाढत्या उकाडय़ामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, डिहायड्रेशन, चक्कर येणे, पायाच्या तळव्यांची आग होणे, डोळ्यांची जळजळ होणे, उलटी असे त्रास होऊ शक्तात. 

आपण सध्या कोरोनाच्या महामारीचा सामना करून बाहेर आलो आहोत अशावेळी ऑक्टोबर हिटचा सामना आपणास करावयाचा आहे कारण तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही आहे. या काळात शक्यतो उन्हामध्ये काम करणे टाळावे, तेलकट - तिखट कमी खावे, पाणी भरपूर पिणे तसेच श्रमदायक काम करीत असताना स्वच्छता पाळणे गरजेचे आहे,कारण संसर्गजन्य आजार सुद्धा या काळात वाढू शकतात"

मुळातच गेली काही वर्षे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. या जागतिक तापमानवाढीमुळे जगातील बर्फाचे साठे वितळण्यापासून तो ऋतू बदलण्यापर्यंत व त्याचा फटका शेतीला बसण्यापर्यंत अनेक अनर्थ घडत आहेत. वातावरणातील कार्बन वाढल्याने पृथ्वीच्या तापमानात झपाटयाने वाढ होत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे ऋतूबदल, बर्फ वितळणे, नद्यांना पूर येणे, वादळे व चक्रीवादळे यांचे प्रमाण वाढणे, भारतासारख्या देशात अतिवृष्टी होणे व पर्जन्यमान अनियमित होणे, अशी संकटे येत आहेत अशी माहिती डॉ. प्रवीण भुजबळ यांनी दिली.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...