Skip to main content

न्यूज अपडेट: तरुण कलावंतांनी नवी मुंबईत उभा केला रेकॉर्डिंग स्टुडिओ; सिनेकलाकारांनी लावली उद्घाटन सोहळ्याला हजेरी..।।

न्यूज अपडेट: तरुण कलावंतांनी नवी मुंबईत उभा केला रेकॉर्डिंग स्टुडिओ; सिनेकलाकारांनी लावली उद्घाटन सोहळ्याला हजेरी..।।

नवी मुंबई :- कला आणि सिनेसृष्टीत नव्या तरुण कलावंतांना अनेक काळ संघर्ष केल्यानंतर काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे अनेक तरुण कलावंत सुरुवातीलाच हार मानतात, तर काही जिद्दीच्या जोरावर कला क्षेत्रात आपलं नाव मोठ करतात. त्यामुळे फार कमी तरुण या क्षेत्राकडे वळतात. मात्र, याच कला क्षेत्रात महाराष्ट्राच्या विविध भागातील तरुणांनी आपलं वेगळं स्थान निर्माण करत नवी मुंबईत स्वत:चा सुज्ज रेकाॅर्डिंग स्टुडिओ उभा केला आहे. नुकत्याच या स्टुडिओचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून त्याला मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांनी हजेरी दर्शवली. 

कला क्षेत्रात संघर्षमय प्रवास करत आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत महाराष्ट्राच्या विविध भागातल्या तरुणांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत नवी मुंबईच्या तुर्भे येथे सुसज्ज स्टुडिओची निर्मिती केली आहे. 'अनुसया आर्ट स्टुडिओ' असे या स्टुडिओचे नाव आहे. शिरीष पवार आणि प्रवीण दाभाडे यांच्या संकल्पनेतून हा स्टुडिओ उभा करण्यात आला. या दोन्ही तरुणांनी रात्रीचा दिवस करत अवघ्या एका महिन्यात हा सुसज्ज स्टुडिओ उभा केला आहे.  

स्टुडिओ उभा करताना या दोन्ही तरुणांना सुप्रसिद्ध शिल्पकार गोपाळ गंगावणे ,शाहीर बाबासाहेब आटकळे, ओमय आनंद, अमित पडवळकर, मनोज पाटील, रवींद्र लोकरे ,असित सकपाळ, आकाश मोरे ,रोशनी कुलकर्णी, कुंदन जाधव आणि संतोष संखद यांनी मोलाची साथ दिली. 

या स्टुडिओचा उद्घाटन सोहळा दि. २६ सप्टेंबर रोजी पार पडला. या सोहळ्याला अभिनेत्री नम्रता आवटे, वनिता खरात यांची विशेष उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. 

यावेळी अनुसया आर्ट प्रायव्हेट लिमिटेड, निजात कलेक्टिव्ह संकल्पनि क्रिएशन्स् आणि ऊदान प्रोडक्शन्स यांची संयुक्त निर्मिती असणारे तीन महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट घोषित करण्यात आले. यामध्ये दोन मराठी चित्रपट आणि वेबसीरिज चा पोस्टर लॉन्चिंग चा सोहळा संपन्न झाला. ओमय साठे यांच्या 'गोंधळ' आणि रवींद्र शिवाजी यांच्या 'रौद्र' या मराठी चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. तसेच संतोष संखद आणि शिरीष पवार यांच्या T F F- 'दि फकींग फ्रेंड्स' या वेबसिरीजचे पोस्टर देखील अनावरण करण्यात आले.

(बातमी- विशाल गांगुर्डे)









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...