Skip to main content

न्यूज अपडेट: आगरी साहित्यिक सर्वेश तरेंची नवी संकल्पना; आईचे स्वप्न साकारत "चिऊताई फाउंडेशन" द्वारे कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी आवाहन:

न्यूज अपडेट: आगरी साहित्यिक सर्वेश तरेंची नवी संकल्पना; आईचे स्वप्न साकारत "चिऊताई फाउंडेशन" द्वारे कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी आवाहन:

ठाणे (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- आगरी साहित्यीक सर्वेश तरे यांनी आपल्या आईचे स्वप्न साकारण्यासाठी "चिऊताई फाउंडेशन" ची स्थापना करीत, कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना मदत करण्याचे ठरवले आहे. मागील काही महिन्यांपूर्वीच सर्वेश तरे यांच्या आई अश्विनी तरे यांना स्वर्गवास झाला. कॅन्सर पीडितांना मदत करणे ही त्यांच्या आईची इच्छा होती, आपल्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने येत्या २० जुलैला आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिऊताई फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सर पीडितांना मदत करण्याचे आवाहन समोर ठेवीत ह्या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.

भिवंडी येथील रोटरी क्लब ऑफ भिवंडी अर्थात बिकेसी द्वारे कॅन्सर ग्रस्त रुग्णांवर किमोथेरपी आणि डायलिसिस मोफतरित्या केले जाते. आता पर्यंत अनेक कॅन्सरग्रस्तांनी याचा लाभ घेतला आहे . यंदा बिकेसीच्या माध्यमातून तब्बल ५०० रुग्णांवर मोफत डायलिसिस आणि किमोथेरपी करायचे ठरवण्यात आले आहे. बिकेसीच्या ह्या कार्यात सहभाग घेत,प्राणवायू कॅन्सर सेंटर च्या माध्यमातून सर्वेश तरे ह्यांनी चिऊताई फाउंडेशनद्वारे हा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. ह्यासाठी जास्तीत जास्त जणांनी ह्या उपक्रमात आपला सकारात्मक सहभाग दाखवून जमेल त्या प्रकारे छोटीशी आर्थिक मदत करावी असे आवाहन सर्वेश तरे ह्यांनी केले आहे. 

"वाढदिवशी कोणत्याही प्रकारची भेटवस्तू आणि शुभेच्छा न देता,चिऊताई फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभाग घेत सढळ हाताने मदत करावी असे आवाहन सर्वेश तरे यांनी आपल्या प्रियजनांना केले आहे"






महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...