Skip to main content

न्यूज अपडेट: नवी मुंबई शहरातील ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानामधून येणाऱ्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास:

न्यूज अपडेट: नवी मुंबई शहरातील ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानामधून येणाऱ्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास:

नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- नवी मुंबई शहरातील पाम बीच मार्गालगत मोक्याचा ठिकाणी वसवलेल्या नेरुळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई उद्यानातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वरवर आकर्षित दिसणाऱ्या या उद्यानात सर्वाधिक प्लास्टिक कचरा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या उद्यानात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

सर्वाधिक उद्याने असणाऱ्या शहरांमध्ये नवी मुंबई शहराचे नाव कायम अग्रस्थानी असते. १२० हून अधिक उद्यानांचा समावेश असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेने नेरुळ येथे ज्वेल ऑफ नवी हे सर्व सोयीसुविधांनी समृद्ध असे भव्य उद्यान काही वर्षांपूर्वी विकसित केले आहे. तलावाच्या सभोवताली सुमारे अडीच किलोमीटर अंतर असणारा जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, प्रसाधनगृह, पार्किंग, आधुनिक विद्युत व्यवस्था अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भव्य जॉगिंग ट्रॅकमुळे तरुणाईबरोबर, वृद्धांचे व्यायाम करण्यासाठी येण्याचे प्रमाणदेखील मोठे आहे.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून या उद्यानातील समस्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तलावात सोडण्यात आलेल्या मलवाहिन्यांच्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने सद्यस्थितीत उद्याने पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून उद्यानातील प्लास्टिक कचरा तसेच दुर्गंधी याबाबत नागरिकांकडून महापालिकेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र महापालिका प्रशासनाने याची दखल न घेतल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...