Skip to main content

न्यूज अपडेट: लढा भूमीपुत्रांचा, ध्यास दि.बा.पाटील नावाचा..!!

न्यूज अपडेट: लढा भूमीपुत्रांचा, ध्यास दि.बा.पाटील नावाचा..!!

नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- महाराष्ट्र असलेली ७२० किमी लांब एवढी कोकणकिनारपट्टी ही फार विशाल आहे. ह्याच कोकणकिनारपट्टीत असलेली पालघर, ठाणे, रायगड हे विभाग सर्वांना ज्ञात असतीलच. या विभागात असलेले आगरी , कोळी, कराडी, कुणबी, तटकरी, आदिवासी समाज म्हणजे परंपरेचा वारसा जपणारे स्रोतच आहेत. भारत देशातच नव्हे तर  सबंध जगभरात अश्या व्यक्ती होऊन गेल्यात ज्यांच्यामुळे त्या समाजाला न्याय व हक्क मिळालेत. अर्थातच ती व्यक्ती समाजाची आधारस्तंभ बनते. त्याच प्रमाणे आगरी कोळी कराडी समाजातील स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देऊन समाजाचा उद्धार करणारे माजी खासदार स्व. दि.बा.पाटील हे या समाजाचे दैवत मानले जातात. आपल्या समाजासाठी असलेले प्रेम व जिव्हाळा दि.बा. पाटील यांच्या कार्यातून दिसून आले आहे.  

देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी दिन-रात कष्ट करून देशाची काळजी घेतो. पण त्याची काळजी कोणीही घेतली नाही. पण दि.बा.पाटील यांनी स्थानिक शेतकऱ्यांसाठी व त्यांचे अस्तित्व टिकुन रहावे यासाठी अनेक लढे दिले. वर्षोनुवर्षे त्यांनी रायगड व ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांना , शेतकऱ्यांना एकत्र घेऊन संघर्ष केला. साल १९७० ते १९८४ इतकी वर्षे सातत्याने संघर्ष केल्या नंतर अखेर १२.५ टक्क्यांच्या कायदा मंजूर झाला व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात १२.५ टक्के एवढा विकसित भूखंड देण्याचा कायदा पुढे आला. या मागे आपल्या समाजाचा विकास व भरभराटी हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून दि.बा. पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा यशस्वी करून दाखवला. समृद्ध नवी मुंबई घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचे नाव न देता विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पालघर , ठाणे , रायगड , मुंबई , विभागातील स्थानिक भूमिपुत्र करत आहेत. त्यामुळे आता नामकरणाबाबत वाद चालले आहेत. प्रत्येक समाजासाठी असंख्य आदर्श व्यक्तींनी कामगिरी केली आहे म्हणून त्या समाजाने त्या आदर्श व्यक्तींवर असलेल्या प्रेम व निष्ठतेसाठी योग्य कार्य करून प्रेरणास्तंभांचे नाव मोठे केले आहे. त्याच प्रमाणे  आगरी कोळी कराडी समाजातील स्थानिक भूमीपुत्रांचे प्रेरणास्थान असलेले दि.बा.पाटील यांच्या कार्याप्रति व समाजाच्या अस्तित्वासाठी सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी आता लढा पुकारला आहे. सर्व भूमीपुत्रांनी एकत्र येऊन संघर्षाला सुरुवात केली आहे , तरुणाईने सुद्धा ह्यात आता आपला सहभाग नोंदवला आहे.नवी मुंबई विमानतळाबाबतच्या लढयात समाजाच्या अस्तित्वासाठी सर्वजण एकत्र आले आहेत व हा लढा नक्कीच यशस्वी होईल असा आत्मविश्वास भूमिपुत्रांना दाखविला आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...