Skip to main content

न्यूज अपडेट: पनवेल महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याहस्ते पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण:

न्यूज अपडेट: पनवेल महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याहस्ते पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण:

पनवेल / (प्रतिनिधी) : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त विविध ७० सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आजपर्यंत अनेक लोकउपयोगी कार्यक्रम पार पडले आहेत. त्याचप्रमाणे पनवेलमध्ये शनिवार दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी पाककलेची आवड असणाऱ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते लॉकडाऊनमुळे हि स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज स्टार्टर पदार्थांचा समावेश होता. या स्पर्धेत अनेक महिलांनी व पुरुषांनी देखील सहभाग घेऊन भरघोस प्रतिसाद दिला. उत्कृष्ठ पाककलाकृती सादर करणाऱ्या भगिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. 

सदर पाककला स्पर्धा हि अल्पसंख्यांक इंग्रजी स्कूल येथे होणार होती मात्र वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने हि स्पर्धा घेऊन याचा निकाल जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे स्पर्धकांना त्यांनी बनवलेले पदार्थ होम डिलिव्हरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार पनवेल, तळोजा, नवीन पनवेल याठिकाणाहून स्पर्धकांनी त्यांचे पदार्थ पाठवून दिले होते त्यानुसार परीक्षकांनि पदार्थांची चव घेऊन त्याप्रमाणे निकाल दिले. यामध्ये प्रथम क्रमांक निगार आसिफ सुभेदार तळोजे यांनी चिकन फिश चिकन चेक्स चटई, चिकन चिस ब्रेड बर्गर आणि चिकन फिंगर्स हे पदार्थ बनवून पटकावला तर द्वितीय क्रमांक पनवेल कच्छी मोहल्ला येथे राहणारे नदीम कुंवारी यांनी चिकन क्रिस्पी, चिकन मलाई कटलेट, दही वडा हे पदार्थ बनवून पटकावला व तृतीय क्रमांकांचे मानकरी भुसार मोहल्ला येथे राहणाऱ्या तांबे आर्शिया अब्दुल अजीज यांनी चिकन नगेट्स बनवून ठरल्या आहेत या प्रमाणे उत्तेजनार्थ म्हणून नवीन पनवेल येथे राहणारे व जिंजर स्पाईस या प्रसिद्ध चायनीजचे आशिष राजेंद्र गुप्ता यांनी चिकन पदार्थ बनवल्याने त्यांना जाहीर करण्यात आले होते. 

या सर्व विजेत्यांना आज पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, आशा कि किरण फाउंडेशनच्या Co Founder नूरजहाँ कुरेशी MSW, रे एज्युकेशनच्या फाउंडर आयेशा रणदिवे यांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी महापौर कविता चौतमोल यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सुरु असलेल्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सहचिटणीस केवल महाडिक, आशा कि किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी, नवीन पनवेल उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, अमित पंडित, ओमकार महाडिक, रहीस शेख, सतीश झेंडे आदी उपस्थित होते.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...