Skip to main content

न्यूज अपडेट: जनतेसाठी एक दिलासा देणारी शक्यता तज्ज्ञांकडून; महाराष्ट्रात करोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता कमी, कारण…!!

न्यूज अपडेट: जनतेसाठी एक दिलासा देणारी शक्यता तज्ज्ञांकडून; महाराष्ट्रात करोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता कमी, कारण…!!

● समजुन घेऊया महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढीसंदर्भातील आकडेवारी नक्की काय सांगतेय??

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- मागच्या काही दिवसांपासून देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातही महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्या आसपास आहे. मागील अनेक दिवसांपासून याच आकडेवारीच्या आजूबाजूला महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आहे. एकीकडे ही आकडेवारी धडकी भरवणारी असली तरी दुसरीकडे या आकडेवारीच्या आधारे महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासा देणारी शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय. ६० हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर झालेली असल्याने महाराष्ट्रामध्ये करोना लाटेचा कळस म्हणजेच कोव्हिड वेव्हचा पिक अर्थात उच्चांक गाठल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती ही महाराष्ट्रासाठी वाईटातून चांगलं अशी आहे.

गुरुवारी महाराष्ट्रामध्ये ६१ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले. सध्याच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या ही ६३ हजार २९४ इतकी आहे. मागील रविवारी म्हणजेच, ११ एप्रिल रोजी राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर पाच दिवस रुग्णसंख्येची वाढ ६० हजारांच्या आसपास आहे. मागील आठवडा हा मार्च महिन्यापासून सर्वाधिक स्थिर रुग्ण संख्या असणारा आठवडा ठरला. यासंदर्भात आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक असणाऱ्या मनिंदर अग्रवाल यांनी, “महाराष्ट्राने करोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठल्याचं चित्र दिसत आहे. यासंदर्भातील आकडेवारी तरी तसंच दर्शवत आहे. पुढील काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याचं आपल्याला पहायला मिळाले,” असं मत नोंदवलं आहे. देशातील करोना संसर्गासंदर्भातील माहिती गोळा करण्याचं काम अग्रवाल करत आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये करोना रुग्णसंख्येचा उच्चांक दिसून आला आहे किंवा त्यांची वाटचाल उच्चांकाच्या आसपास आहे. खास करुन पुण्याने तर उच्चांक गाठलाय असं मला वाटतं,” असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ ही पुण्यात दिसून आली. देशभरातील सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या शहरांच्या यादीतही पुण्याचा समावेश झाल्याचं पहायला मिळालं. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली त्या दिवशी म्हणजे ११ एप्रिल रोजी पुण्यात करोनाचे १२ हजार ५९० रुग्ण आढळून आले होते. मात्र त्यानंतर पुण्याऐवजी दिल्लीतील आकडेवारी वाढत असल्याचं चित्र दिसलं. 

पुढील काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही करोना रुग्णसंख्या कमी होईल असा अंदाजही अग्रवाल यांनी व्यक्त केलाय. “आमच्या अपेक्षेप्रमाणेच छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमध्ये रुग्णसंख्या वाढ दिसून आली आहे. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढ अशीच होत राहिली तर पुढल्या आठवड्याभरात या राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल. देशामध्येच २५ एप्रिलपर्यंत रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता असल्याने त्याचाही हा परिणाम असू शकतो,” असं मत अग्रवाल यांनी व्यक्त केलं.

कंप्युटरच्या (Computer) मदतीने तयार करण्यात आलेल्या करोना रुग्णसंख्येसंदर्भातील डेटाबेस हा आतापर्यंत योग्य अंदाज व्यक्त करत आलाय, असं अग्रवाल सांगतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यानचे आकडे अग्रवाल आणि त्यांच्या टीमने अचूक पद्धतीने सांगितले होते. मात्र दुसऱ्या करोना लाटेचा एवढा परिणाम होईल असं या टीमला वाटलं नव्हतं. अनेक वैज्ञानिकांनी अग्रवाल आणि त्यांच्या टीमच्या या मॉडेलवर टीका केलीय. मात्र नवीन माहितीनुसार आम्ही सतत आमचे मॉडेल अपडेट करत असल्याचं अग्रवाल सांगतात.

गुरुवारी देशात दोन लाख १७ हजार रुग्ण आढळून आले. मात्र महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ३० टक्क्यांनी घटल्याचं दोन महिन्यात पहिल्यांदाच दिसून आलं. तीन आठवड्यांपूर्वी देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ६० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील होते. मागील काही दिवसांमध्ये देशातील करोना रुग्णांची संख्या चार पटींने वाढली आहे. ५२ हजार रुग्णांवरुन आज रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढेच आहे. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही केवळ दुपट्टीने वाढलीय हे सुद्धा महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याचे संकेत आहेत असं सांगण्यात येत आहे.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...