Skip to main content

न्यूज अपडेट: पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारी वाढवण्याच्या श्रेयस ठाकूर यांच्या मागणीला यश:

न्यूज अपडेट: पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारी वाढवण्याच्या श्रेयस ठाकूर यांच्या मागणीला यश:

● मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO) ने दखल घेत महापालिका आयुक्तांना उचित कारवाई करण्यासाठी पाठवले पत्र*

पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :-  पनवेल शहरातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळाची गरज आहे.येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराकरिता डॉक्टर व आरोग्य कर्मचारी पुरवण्याची मागणी दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना पत्राद्वारे केली होती. पत्राची दखल मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO)ने घेतली व महापालिका आयुक्त यांना पत्र पाठवत सदर प्रकरणी आपल्या स्तरावरून शासनाच्या प्रचलित कायदे, नियम, धोरणानुसार उचित तत्काळ कार्यवाही करावी व अर्जदारास परस्पर कळविण्यात यावे, तसेच एक प्रत विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन यांना पाठविण्यात यावी असे पत्र मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल) तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन यांनी श्रेयस ठाकूर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. उपजिल्हा रुग्णालयाची सद्यस्तिथी पाहता १५६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल आहेत.

त्यापैकी ऑक्सिजन ६० रुग्ण, ICU ८ रुग्ण. इतके रुग्ण सद्यस्तिथीत उपचार घेत आहेत.इतक्या रुग्णांच्या उपचाराकरिता कमीत कमी २ फिजिशियन,२ भूलतज्ञ, तसेच १० वार्ड बॉय, २ औषधनिर्माता एवढ्या मनुष्यबळाची गरज असून सध्या उपजिल्हा रुग्णालयात १ फिजिशियन गेल्या ४ महिन्यांपासून एकट्याच कार्यरत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ पुरवल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होईल. सध्यास्थितीत नवी मुंबईच्या रुग्णालयात भूलतज्ञ व फिजिशियन २.५ लक्ष एवढे मानधन घेत आहेत. पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात तेवढेच मानधन दिल्यास ते उपजिल्हा रुग्णालयात काम करण्यास उपलब्ध होतील.त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराकरिता डॉक्टर व आरोग्य कर्मचारी पुरवण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती पत्राद्वारे केली होती. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.त्यासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. श्रेयस ठाकूर यांच्या मागणीला यश आले असून कोरोना रुग्णांना याचा लाभ होणार असल्याने श्रेयस ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आहे.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...