Skip to main content

न्यूज अपडेट: शिवसेनेचे उरणमध्ये महारक्तदान शिबिर 150 जणांनी केलं रक्तदान:

न्यूज अपडेट: शिवसेनेचे उरणमध्ये महारक्तदान शिबिर 150 जणांनी केलं रक्तदान:

उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकुर) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उरण तालुक्यातील शिवसेना युवासेना नवघर चिरनेर जासई विभागाच्या वतीने सद्गुरू चॅरिटेबल ब्लड बँक कोपरखैरणे यांच्या सहयोगाने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जे एन पी टी वसाहतीत भरवलेल्या या शिबीरात 150 जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले. 

तत्पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख  माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी. एन. डाकी, यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन करण्यात आले.  शिबिराला जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, हिराजी घरत, कामगार नेते महादेव घरत, गणेश म्हात्रे,गणेश घरत, रुपेश पाटील, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, अमित भगत, गणेश घरत, कृष्णा घरत,(उप.ता.संघटक) विभाग प्रमुख संदेश पाटील, भूषण ठाकूर, विश्वास तांडेल, शिक्षकसेनेचे कौशिक ठाकूर, युवासेनेचे निशांत घरत, सुदीप ठाकूर, वेश्वी सरपंच संदीप कातकरी, श्री रविंद्र पाटील (शाखा प्रमुख वेश्वी), नारायण तांडेल (शाखा प्रमुख सोनारी), जगजिवन भोईर (शाखा प्रमुख द्रोणागिरी), आकाश पाटील, सचीन पाटील, सुमित ठाकूर, प्रज्वल पाटील  यांच्यासह.क्च्छ युवा संघ नवी मुंबई चे राहुल देढीया(महामंत्री ), राजेश जैन (संयोजक नवी मुंबई ), शास्त्री जी (107वेळा रक्तदान करणारे), चंद्रकांत देढीया, निलेश मोर्बिया, अंबर जैन, जयंतीलाल छेड़ा, समरजित यादव सह अनेकांनी उपस्थिती दर्शवली.

देशभरात कोरोनाचे संक्रमण होत असताना अनेक रक्तपेढ्यात  रक्ताचा तुटवडा होत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले होते. मागील वर्षभरात माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण विधानसभा मतदारसंघात 1200 हुन अधिक रक्तपिशव्या संकलित केल्या होत्या. आता या मोहिमेला पुन्हा नव्याने सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात उरण तालुक्यात दोन रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. रविवारी 17 रोजी चाणजे तसेच उरण शहर विभाग आणि उरण विधानसभा मतदारसंघात 10 रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती माजी आमदार आमदार मनोहरशेठ भोईर यांनी दिली.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...