Skip to main content

न्यूज अपडेट: कोरोना संक्रमण काळात भारतातातील क्षयरोग रुग्णांकडे दुर्लक्ष:

न्यूज अपडेट: कोरोना संक्रमण काळात भारतातातील क्षयरोग रुग्णांकडे दुर्लक्ष:

कोरोनाबाधितांना क्षयरोग होण्याचा धोका कायम - जगातील टीबीचे साधारण एक चतुर्थांश रुग्ण भारतामध्ये.

नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- भारतातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये वाढलेल्या आयुर्मानासोबत वाढते आजारांचे ओझे  वाढत असून सर्व प्रकारच्या नव्या-जुन्या, संसर्गजन्य व जीवनशैलीने होणाऱ्या आजारांची व्याप्ती वाढताना दिसत आहे. यामध्ये अ‍ॅनेमियापासून कॅन्सर तर डायरियापासून एड्स व आता कोरोना सारख्या माहामारीचा सुद्धा समावेश आहे. कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून टीबी या रोगाकडे दुर्लक्ष होतां दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतो त्यावेळी तो विषाणू फुफ्फुसावर हल्ला करतो. क्षयरोग हा देखील फुफ्फुसाचाच आजार आहे. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर क्षयरोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आजमितीला याचे प्रमाण अथवा टक्केवारी उपलब्ध नाही परंतु दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना झालेल्या रुग्णांना क्षयरोग म्हणजेच टीबी होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. गेल्या जागतिक क्षयरोग दिनाला " न भुतो न भविष्यती" असा कोरोना महामारीचा काळ सुरु झाल्यापासून सर्व आरोग्य यंत्रणा ही या महामारीशी लढण्यासाठी आपण खर्ची घालत आहोत. कोरोना महामारीच्या पूर्वी भारताला टीबी मुक्त करण्यासाठी अनेक योजना राबविल्या होत्या, स्वतः महानायक अमिताभ बच्चन यांनी जाहिरातींचे शिवधनुष्य हातात घेतले होते परंतु कोरोनाने या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टार सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व जेष्ठ फिजिशियन व चेस्ट मेडिसीन डॉ. प्रवीण भुजबळ म्हणाले, "पूर्ण जगातील टीबीचे साधारण एकचतुर्थाश रुग्ण भारतामध्ये आढळतात, टीबी हा संसर्गजन्य. खोकताना, थुंकताना, बोलताना, शिंकताना रुग्णांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे हवेतून पसरणारा हा आजार. उपचार न घेतलेला असा रुग्ण वर्षभरात जवळच्या सान्निध्यातील १० ते १५ व्यक्तींना टीबीची लागण करतो. त्यामुळे टीबीने खोकणाऱ्या व्यक्तीचा आजार हा त्याच्यापुरता मर्यादित प्रश्न नसतो, तर ती सर्व समाजाची समस्या ठरते. कोरोनाच्या बाबतीत सुद्धा हेच घडत आहे आज करोना झाल्यानंतर रुग्णाला मास्क वापरणे, अंतर राखणे हे सर्व नियम सांगितले जातात. वास्तविक क्षय रुग्णांसाठी आधीपासूनच हे नियम आहेत. 

कारण खोकताना, थुंकीवाटे जसा क्षयाचा प्रसार होतो तसाच कोरोनाचाही होतो. त्यामुळे रुग्ण तसेच संपर्कातील लोकांनी काळजी घेण्याची गरज असते. घनदाट लोकवस्ती, दारिद्रय़, कुपोषण, कोंदट घरे, सार्वजनिक वाहतुकीत तुडुंब वाहणारी गर्दी, कोठेही थुंकणे, कसेही खोकणे अशा सवयी, व्यसने अशा पोषक वातावरणात टीबीचा फैलाव हवेतून एकाकडून दुसऱ्याकडे सहजतेने होत जातो आणि मग ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी, तो अ‍ॅक्टिव्ह टीबीचा शिकार होतो. लक्षणे दिसू लागतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या क्षय झालेल्या सर्वच रुग्णांची करोना चाचणीही करण्यात येत आहे. 

त्याचप्रमाणे कोरोना झालेल्या काही रुग्णांना क्षयाची चाचणी करायला सांगितले जात आहे. काही कोरोना रुग्णांना कोव्हिड बरा झाल्यानंतर खोकला सुरूच राहतो. त्यामुळे मग असे संशयित रुग्ण शोधून त्यांना क्षयाची चाचणी करण्याचा आम्ही सल्ला देत आहोत."क्षयरोग दिनाचे औचित्य साधून भारत सरकारतर्फे २०२५ पर्यंत 'क्षयरोगमुक्त भारत' अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी जागतिक क्षयरोग दिनाला सुरु झालेले कोरोना संक्रमण अजूनही आटोक्यात आलेले नाही त्यामुळे क्षयरोगाला आवर घालण्यासाठी  तोंडावर मास्क, सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम काटेकोरपणाने पाळले पाहिजे असा सल्ला  जेष्ठ फिजिशियन व चेस्ट मेडिसिन तज्ञ  डॉ. प्रवीण भुजबळ यांनी दिला.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...