Skip to main content

न्यूज अपडेट: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई करांसाठी नि‍यमावली जाहीर:

न्यूज अपडेट: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई करांसाठी नि‍यमावली जाहीर:

● कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार यांच्यासाठी नवी नि‍यमावली जाहीर

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- मागील काही दि‍वसांपासून कोव्हीड-19 बाधि‍त रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ लक्षात घेऊन कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालि‍केच्या वतीने पुन्हा अधि‍क प्रभावीपणे “मि‍शन ब्रेक द चेन” राबवि‍ण्यात येत आहे. यादृष्टीने वि‍वि‍ध उपाययोजना करताना महापालि‍का आयुक्त श्री. अभि‍जीत बांगर यांनी मॉल्स, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार अशा गर्दीच्या संभाव्य ठि‍काणी कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे काटेकोर पालन व्हावे व कोव्हीड प्रादुर्भावाला प्रति‍बंध व्हावा यासाठी नवीन नि‍र्बंध जाहीर केले आहेत.

शॉपींग मॉल्सच्या प्रत्येक प्रवेशव्दारावर (Entry Point) दर शुक्रवारी सायंकाळी 4.00 नंतर तसेच शनि‍वार आणि‍ रवि‍वार पूर्ण वेळ मॉलमध्ये प्रवेश देताना प्रत्येक अभ्यागताची कोव्हीड चाचणी (Rapid Antigen Test) करणे बंधनकारक असणार आहे. कोव्हीड चाचणीचा अहवाल नि‍गेटीव्ह असेल तरच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल किंवा मॉलमध्ये येणाऱ्या अभ्यागताने मागील 72 तासांमधील कोव्हीड चाचणी (RT-PCR) अहवाल नि‍गेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशि‍वाय मॉलमध्ये प्रवेश दि‍ला जाणार नाही.

शॉपींग मॉलमध्ये योग्य सामाजि‍क अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये 50,000/- इतका दंड मॉल व्यवस्थापनाकडून आकारण्यात येईल. दोन वेळा दंड आकारला गेल्यास व ति‍सऱ्यांदा पुन्हा उल्लंघन होत असल्याचे नि‍दर्शनास आल्यास शॉपिंग मॉल पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.

डि‍ मार्ट, रि‍लायन्स फ्रेश, स्टार बाजार यांसारख्या Convenience Stores / Departmental Stores मध्ये एका वेळी कि‍ती अभ्यागत स्टोअरमध्ये उपस्थि‍त राहू शकतील याचा आराखडा तयार करुन त्यानुसार टोकन प्रणाली सुरु करण्यात यावी.

या स्टोअर्समध्ये योग्य सामाजि‍क अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये 50,000/- इतका दंड संबंधित स्टोअर्सच्या व्यवस्थापनाकडून आकारण्यात येईल. दोन वेळा दंड आकारला गेल्यास व ति‍सऱ्यांदा पुन्हा उल्लंघन होत असल्याचे नि‍दर्शनास आल्यास स्टोअर पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.

कोव्हीड-19 वि‍षाणूचा प्रसार रोखण्यासाठी उद्यानांमधील ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचे साहि‍त्य हे पूर्णत: बंद राहतील व त्यांचा वापर करता येणार नाही.

त्याचप्रमाणे सर्व उद्याने सकाळी 5.30 ते सकाळी 10.00 या वेळेव्यतिरिक्त इतर संपूर्ण वेळ बंद राहतील.

दैनंदिन व आठवडी बाजारामध्ये मास्क, सुरक्षि‍त अंतर अशा कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे काटेकोर पालन केले जाणे अनि‍वार्य आहे.

10 मार्च 2021 पासून कोव्हीड बाधि‍त रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दि‍सत आहे. मॉल, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स किंवा उद्याने अशा ठिकाणी होणारी गर्दी व नागरि‍कांकडून मास्क, सुरक्षि‍त अंतर अशा कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे होणारे उल्लंघन यामुळे रुग्णवाढीचा दर अधि‍क वाढू शकतो.

 त्यातही शनि‍वारी, रवि‍वारी मॉलमध्ये होणारी गर्दी पहाता सुरक्षि‍त अंतराच्या नि‍यमाचे पालन होताना दि‍सून येत नाही. वास्तवि‍कत: मॉलमध्ये शनिवार, रविवार अशा आठवड्याच्या अखेरच्या दिवशी होणारी गर्दी आठवड्यातील इतर दिवशी विखुरली जाणे अपेक्षित आहे, जेणेकरून मॉलमधील उपस्थितीचे योग्य नियोजन होऊन सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन होईल. 

त्याचप्रमाणे सार्वजनि‍क बगीचे, उद्याने, पार्क यामध्ये वि‍शेषत्वाने संध्याकाळी अनेक कुटूंबे मास्कशि‍वाय वावरत असल्याचे आढळून येत आहे. त्यामध्येही लहान मुलांना खेळणी, व्यायाम साहि‍त्य यांच्या वारंवार हाताळणीमुळे कोव्हीड संसर्ग होण्याचा धोका अधि‍क होऊ शेकतो. त्यामुळे सदर नि‍र्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

यापेक्षा अधि‍क तीव्र नि‍र्बंध लावण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक नागरि‍काने घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत न चुकता मास्कचा वापर करावा व प्रत्येक ठि‍काणी सुरक्षि‍त अंतराचे भान राखावे तसेच शक्य होईल ति‍तक्या वेळा हात धुवावेत अथवा सॅनि‍टायझरचा वापर करावा असे आवाहन महापालि‍का आयुक्त श्री. अभि‍जीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...