Skip to main content

न्यूज अपडेट: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा..!!

न्यूज अपडेट: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा..!!

पनवेल (प्रतिनिधी/किरण पवार) :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी इथल्या शेतकऱ्यांनी आपली पिढी शेती राहते घर देशाच्या विकासासाठी अर्पण केले सिडकोने इथल्या शेतकऱ्यांना देशातील सर्वोत्तम पुनर्वसन करून देऊ असं आश्वासन दिलं आणि थोड्या फार प्रमाणात त्याने पुनर्वसन केलं सुद्धा परंतु दहा गावातील मोजक्याच शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न शिल्लक राहिलेल्या आहेत आणि सिडको प्रशासनाने जर मनावर घेतला तर ते प्रश्नही लगेच सुटतील. गेल्या तीन वर्षापासून हे शेतकरी सिडको ऑफिस समोर आपले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन, मोर्चे करून शासनाला आपले न्याय हक्क मिळावे म्हणून लढत आहेत. 

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या-

● शुन्य पात्रता/कमी पात्रता /ओटे/शेड.

● चिंचपाडा तळावपाळी तीनपट भुखंड व इतर लाभ.

● मंदिरे व खाजगी मंदीरे यांना पुर्नवसन पॅकेज लागु करावे.

● ड्रेनेज स्किम / टाटा पावर लाईन / देवस्थान व ट्रस्टीच्या जमिनीचे १२.५०% व २२.५०% टक्के विकसीत भुखंड प्रकल्पग्रस्त शेतक-्यांना देण्यात यावे.

● महीला मंडळे व महिला बचत गट यांना सरसकट पुर्नवसन पॅकेज लागु करावे.

● घर भाडे भत्ता मार्केट रेट प्रमाणे स्वतंत्र कुटुंबास देण्यात यावे.

● विमानतळ बाधित परंमपरागत व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरूष मच्छिमारांना २०१३ च्या कायद्या प्रमाणेनुकसान भरपाई देण्यात यावे.

● विमानतळ बाधित १० गावातील १८ वर्षावरील सर्व युवक व युवरतींना प्रशिक्षण व नोकरी तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दाखला देणे.

● बांधकाम खर्च २५००/- रु. प्रती चौ. फुट द्या

समाजिक सुकसुविधा-

● क्रिकेट मैदान.

● आगरी कोळी कराडी समाज भवन. 

● लहान मुलांचे प्ले ग्राउंड व त्याचे शुशोभीकरण.

● गणपती विसर्जन घाट.

● पुर्नवसन क्षेत्रातील पुरातन तलावाचे शुशोभीकरण व तलावाशेजारी आरक्षित ठेवलेल्या गार्डन भूखंडाचे शुशोभीकरण. 

● गावातील सार्वजनिक संस्था व मंडळे यांचा कार्यलयास भूखंड देणे. 

● पुर्नवसन येथील पुरातन वृक्षाचे संवर्धन करणे.

● सार्वजनिक शौचालय व दफन भूखंड आरक्षित करून देणे. 

● पुरातन मरुआई मंदिर व वेशीआई मंदीराचे पुर्नवसाहत ठिकाण स्वतंत्र भूखंड आर १ प्लॉट नं ०६ व ३१ येथे आरक्षित करूण पुनर्वसन लाभ देणे.

● अंगणवाडीसाठी इमारत उभारून देणे.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...