Skip to main content

न्यूज अपडेट: सिडकोला लॉजिस्टिक हब प्रकल्पासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध:

न्यूज अपडेट: सिडकोला लॉजिस्टिक हब प्रकल्पासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध:

उरण (प्रतिनिधी/ सुनिल ठाकुर) :- बैलोंडाखार प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक संस्था आठगाव कमिटीने आयोजित केलेल्या दिघोडे येथील बैठकीत संमती पत्र द्वारे जमीन संपादनास तीव्र विरोध केला आहे. या बैठकीचे आयोजन आठगाव कमिटीचे आध्यक्ष रमण कासकर यांनी दिनांक २७ मार्च २०२१ रोजी दिघोडे ग्रामस्थांचे वतीने केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शामशेट मुंबईकर होते. आठगाव कमिटीचे सेक्रेटरी  रविंद्र कासूकर यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी संमतीने होणार जमिनीचे संपादनाबाबत शेतकरी वर्गात जनजागृती करणेसाठी बैठकीचे आयोजन केले असल्याचे स्पष्ट केले.

किसान सभेचे सेक्रेटरी संजय ठाकूर यांनी सिडकोने शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेले संमतीपत्र ही प्रक्रीया  जमीन संपादनास आयोग्य असल्याचे स्पष्ट केले. या संमती पत्रात "भूमि  संपादन अधिनियम १८९४ तसेच नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ अथवा इतर कोणत्याही कायद्याखाली कोणत्याही न्यायालयात/प्राधिकरणाकडे भूमि संपादन संदर्भ अथवा दावा दाखल करणार नाही" हे  संमतीपत्रातील विधान शेतकरी वर्गाचे योग्य पुनर्वसन नाकारणारे आहे हे संजय ठाकूर यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय किसान सभा रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी संमतीपत्राद्वारे नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला सिडकोने कशी पाने पुसली याची विस्ताराने माहिती दिली. २०१३चा भुसंपादन कायदा व संमतीपत्र यातील फरक समजावून सांगितला. किरण केणी या विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्ताने सिडकोने केलेल्या फसवणूकीचा पाढाच वाचला दिनांक २५ मार्च रोजी सिडकोने व पोलिस प्रशासनाने महिला व लहान मुलांवर  चिंचपाडा येथे केलेला लाठीचार्ज व त्यात प्रकल्पबाधीताना दिलेली हिन वागणूक उपस्थितीत शेतकरी बंधू भगिनींसमोर कथन केली.

या सभेत ९५ गाव सिडको प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष अँड. सुरेश ठाकूर  यांनी सिडकोने प्रकल्पग्रस्तांची गेल्या ५० वर्षात केलेल्या फसवणूकीची माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने सिडको ला शहर व उद्योग उभारणीचे काम दिले होते हे मुळ उद्दीष्ट बाजूला सारून कवडी मोल किंमतीत शेतकऱ्यांकडून जमीन संपादन केले आणि कोट्यावधी रुपये किंमतीला विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले जात नाही. रोजगार देत नाही, शेतकरी शेतीतून बाहेर पडल्यानंतर त्याचे योग्य पुनर्वसन होणार नाही. तेव्हा या जमीनी आपण सिडकोला देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. अँड. चंद्रकांत मढवी यांनी सिडकोच्या अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (भूसंपादन) यांचे कडे कशास्वरुपात हरकत नोंदवावी या संबंधीची माहिती दिली. 

या सभेत अँड. मदन गोवारी, अँड. विजय पाटील ,अँड. निग्रेश पाटील यांनी संबोधित केले. उपस्थित शेतकऱ्यांनी सिडकोला संमतीपत्राद्वारे जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यापूर्वी अशाच स्वरूपाच्या गाव बैठका गावठाण, जांभूळपाडा, दादरपाडा येथे झाल्या आहेत. या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांचा सिडकोला जमीन देण्यास  एकमुखाने विरोध केला आहे.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...