Skip to main content

न्यूज अपडेट: मराठी भाषा वाढली पाहिजे..ती टिकली पाहिजे..पण कशी..??

न्यूज अपडेट: मराठी भाषा वाढली पाहिजे..ती टिकली पाहिजे..पण कशी..??

नवी मुंबई (बार्शी/अनिल देशपांडे) :- आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत...सर्व सामान्य लोकांसाठी मराठी अजून उपलब्धच नाही हे या ठिकाणी खेदाने म्हणावे वाटते.

एखादया मध्यमवर्गीय कुटूंबात ज्यावेळी मुल जन्मते त्यावेळी त्या नवराबायकोचा पहिला प्रश्न हा वासून उभा रहातो की आपल्याला बाळाला कोणत्या इंग्लिश मिडीयम मध्ये घालायचे? आणि इथूनच आपल्या मराठी भाषेची फरफड चालू होते. 

उच्च शिक्षित, उच्च मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय या सर्वाचा प्रथम कल हा इंग्लिश माध्यमाच्या  शाळातून मुलांना शिक्षण देण्याकडे कल असतो, आणि ही मुले जशी जशी मोठी होत जातात तसे तसे पालकांना आणि मुलाना कळते की आपल्याला यातील काहीच आता येत नाही. मग आपली चूक झाली हे पालकांच्या लक्षात येते आणि त्यावेळी वेळ खूप पुढे जाऊन त्या बालकाचे नुकसान झालेलं असतं.

बालकांना जो पर्यंत मातृभाषेतून १+१=२ हा कन्सेप्ट पक्का होत नाही तो पर्यंत त्याला जगातील कोणत्याच भाषेतून काही कळणार नाही...मराठी साठी आग्रह धरणारे फक्त गावातील दुकानाच्या पाट्या इंग्रजी च्या ऐवजी मराठी मध्ये करण्यासाठी आग्रह धरतात पण त्यातून मूळ प्रश्न सुटत नाही. मराठी ही सर्वसामान्यांची भाषा झाली पाहिजे.

आज आपल्याला मिळणारे पॅन कार्ड, कोर्टाचे निकाल, वाहन परवाने काढण्यासाठी भरावे लागणारे फॉर्म, शाळा महाविद्यालयातील भरावे लागणारे प्रवेश फॉर्म, बोर्डाच्या विद्यापीठाच्या गुणपत्रिका या मराठी भाषेतून होण्यासाठी आपण आग्रही झाले पाहिजे, जो पर्यंत आपली भाषा सर्वसमावेशक (friendly user) होत नाही. तो पर्यत ती समाजात बसत नाही.

अनेक गोष्टीचे परवाने मागणीचे आवेदने इंग्रजी मध्ये असल्याने एजंटराज फोफावत रहाते तेच परवाने आपल्या मातृभाषेतून असतील तर सर्वसामान्यांना काय लिहीतोय आणि काय माहिती भरतोय हेही कळत नाही मग हेच का आपले भाषेवरील प्रेम.

मराठी वाढली पाहिजे, टिकली पाहिजे आणि रुळी पाहिजे.


!! मराठी राजभाषा दिनाच्या सर्वाना शुभेच्छा !!







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...