Skip to main content

ब्रेकिंग न्यूज: पूजा चव्हाणच्या बहिणीची भावनिक पोस्ट; आमच्या कुटुंबाला जीव द्यावा लागेल, बदनामी थांबवा:

ब्रेकिंग न्यूज: पूजा चव्हाणच्या बहिणीची भावनिक पोस्ट; आमच्या कुटुंबाला जीव द्यावा लागेल, बदनामी थांबवा:

नवी मुंबई (बातमी/औरंगाबाद) :- पूजा चव्हाणच्या आत्महत्येमुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेनेचे संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. राज्य पातळीवर मोठ्या हालचाली सुरू असताना मात्र मृत पूजाच्या कुटुंबीयांनाही मोठ्या बदनामीला सामोरे जावे लागत आहेत. काही माध्यमांच्या दाव्यानूसार पूजा आणि संजय राठोड यांचे प्रेमसंबंध होते. शिवाय राठोड यांनी पूजाला अनेक महागडे गिफ्ट्सही दिले होते.

यावर पूजाची बहिण दिया चव्हाण हिने संताप व्यक्त केलाय. पूजा आणि आमच्या परिवाराची बदनामी थांबवा अशी तिने हात जोडून माध्यमांना विनंती केली आहे. तसेच या बदनामीला कंटाळून कोणी आमच्या कुटुंबातून जायची वाट पाहात असाल तर सांगा, आम्ही ते ही करूत असे भावनिक आवाहन दियाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

पोस्टमध्ये ती म्हणतेय की, ”वृत्तमाध्यमे सत्य लोकांसमोर यावे यासाठीच असतात ना? पंकजा मुंडे, प्रितम मुंडे त्यांच्यासोबतच्याही पूजाच्या पोस्ट आहेत. त्या का नाही कोणी व्हायरल करत? जर त्या पुरूष असत्या तर त्यांच्यासोबतही नाव जोडले असते. माध्यमे ही काहीही मनघडन, त्यांच्या आवडीनूसार, काहीपण कॅप्शन देऊन वाटेल ते पूजाच्या नावाने खोटी माहिती प्रसारित करण्यासाठीत आहेत. प्रसार माध्यमातून सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत. म्हणे पूजाला कोणाकडून गिफ्ट मिळाले आहेत. आणि ते कथित व्यक्तिकडूनच भेटले असा दावाही वृत्तवाहिन्या करत आहेत.

हे असे दररोज काहीतरी नवीन ऐकूण माध्यमांवरून विश्वास उडाला आहे. कोणाचे दु:ख कमी करू शकत नसाल तर कृपया हात जोडून विनंती आहे की त्यात भर तरी टाकू नका. हा त्रास आता दिवसेंदिवस असहनीय होत आहे. पूजा सुद्धा कोणाची तरी लेक किंवा कोणाची तरी बहिण आहे. अशा प्रकारची बदनामी करत आहात तुम्ही. आम्ही सहन तरी कशी करणार? माझ्या आई-वडिलांना काही व्हावे असे तुमची इच्छा आहे का? अनेकदा सर्वांना विनंतरी करूनही आमची बदनामी करणे थांबवत नाहीयेत. या बदनामीला कंटाळून कोणी आमच्या कुटुंबातून जायची वाट पाहात असाल तर सांगा, आम्ही ते ही करूत…” असे भावनिक आवाहन तिने केले आहे.

दरम्यान, मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी संजय राठोड यांच्यावर टीका करतानाच मीडियाला देखील एक विनंती केली आहे. पूजाचे पर्सनल फोटो प्रसारित केल्याने, आमच्या लेकींवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे मीडियाने पूजाचे पर्सनल फोटो दाखवणे बंद करावे, अशी विनंती रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...