Skip to main content

न्यूज अपडेट :"आगरी-कोळी सांस्कृतिक भवन" सुरू न केल्यास टाळे तोडणार; असा इशारा मनोज मेहेर यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालकांना दिला:

न्यूज अपडेट :"आगरी-कोळी सांस्कृतिक भवन" सुरू न केल्यास टाळे तोडणार; असा इशारा मनोज मेहेर यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालकांना दिला:

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नेरूळ सेक्टर 24 येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन बंद असल्याने आगरी-कोळी समाजाला विवाहासाठी अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांची आर्थिक पिळवणूक होत आहे. 10 फेब्रुवारीपर्यत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू न केल्यास टाळे तोडून आगरी-कोळी समाजाचे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू करण्याचा इशारा महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळेचे ग्रामस्थ मनोज मेहेर यांनी लेखी निवेदनातून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे.

कोरोना पर्व सुरू झाल्यापासून सिडकोने नेरूळ सेक्टर 24 येथील ‘आगरी कोळी सांस्कृतिक भवन’ बंदच ठेवले आहे. सध्या कोरोना आटोक्यात येत असून बाहेरील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. अन्य सर्व सांस्कृतिक भवन, विवाहाचे हॉल, अन्य हॉल, वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह, इतकेच नाही तर महापालिकेचेही हॉल आता रहीवाशांसाठी सुरू झाले आहेत. तथापि सिडकोचे आगरी-कोळी सांस्कृतिक भवन आजही बंदच आहे. स्थानिक आगरी-कोळी बांधवांना आता विवाहासाठी अन्यत्र महागड्या दराने हॉल घ्यावे लागत आहे.

आगरी-कोळी समाजासाठी बांधलेले भवन बंद असल्याने या समाजाची आर्थिक फरफट होत आहे. खासगी तसेच सरकारी हॉल सुरु असताना सिडकोचे ‘आगरी कोळी सांस्कृतिक भवन’ अजून का बंद आहे. ज्या स्थानिक आगरी कोळी समाजबांधवांच्या नावाने हे भवन बांधण्यात आले आहे, त्या समाजाला आज विवाहासाठी भवन उपलब्ध नसल्याने स्थानिक आगरी-कोळी समाज बांधवांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यांना इतरत्र अव्वाच्या सव्वा भाडे देवून विवाहासाठी हॉल कार्यक्रमासाठी घ्यावे लागत आहे.

स्थानिकांची विवाहासाठी अन्य हॉलसाठी होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी लवकरात लवकर आगरी-कोळी भवन रहीवाशांसाठी सुरू होणे आवश्‍यक आहे. 10 फेब्रुवारीपर्यत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू न झाल्यास नेरूळमधील स्थानिक आगरी-कोळी ग्रामस्थ या भवनचे टाळे तोडून कार्यक्रम करण्यास सुरूवात करणार आहोत, याची नोंद घ्यावी. हे भवन आपण सुरू न केल्यास आम्हाला आमच्या आगरी-कोळी समाजबांधवांसाठी टाळे तोडून भवन सुरू करावे लागणार आहे व यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रसंग निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी सिडको जबाबदार राहील, असा इशारा मनोज मेहेर यांनी दिला आहे.

याबाबत मनोज मेहेर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही स्वतंत्रपणे निवेदन सादर केले आहे.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...