Skip to main content

न्यूज अपडेट : विकासक विमल शहा समोर या दलालांना पुढे करू नकोस;डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट : विकासक विमल शहा समोर या दलालांना पुढे करू नकोस;डॉ. राजन माकणीकर:

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- विकासक विमल शहा समोर ये महादलाल व भडवेगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढे करून स्वतःची पोळी भाजून घेऊ नकोस. अन्यथा वंचित झोपडी धारकांसह  तुझ्या घराचा ताबा घेऊ. अशी चेतावणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिली आहे.

वेळ आली आहे तुझी व तुझ्या महादलाल तथा मस्तवाल अधिकाऱ्यांना नागडे करण्याची, झोपडीपासून वंचित राहिलेल्यांना सदनिका कश्या मिळत नाहीत हे पाहून घेऊ, कायद्यासमोर तुझ्यासखे छप्पन आडवे झालेत. तू काय चीज आहेस, तुला कायद्याचा व खऱ्या आंबेडकरी वाद्यांचा बडगा दाखवतो. अश्या शब्दात डॉ राजन माकणीकर यांनी एम.आय.डी.सी प्रकल्पात चोरी झाल्याचे सांगून अश्या चोरास नागडे करणार असल्याचे संकल्प व्यक्त केला आहे.

शासनाचा प्रकल्पात भडवेगिरी करून महाभ्रष्टाचार करणारे विकासक व एमआयडीसी अधिकारी दोघांची खैर नाही, वीस वर्षांपूर्वी पात्र केलेल्यांना पुन्हा दस्ताऐवजांच्या आधारावर अपात्र करून सदनिका गळपाटण्याचा विकासाकाचा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही धडक मोर्चा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेकडोंना विनालॉटरी सदनिकेत घुसवनार्यांना लवकरच त्यांची जागा दाखवून खरा सूत्रधार शोधण्यासाठी शेकडोंचा हा मोर्चा प्रकल्पाचा कायापालट करेल हे निश्चित.

प्रकल्पात सुरुवातीपासून काम करणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या वंशावळी संपत्तीची चौकशी लावून वीस वर्षपूर्वी कार्ट्रेज विकणारा परप्रांतीय धनदांडगा कसा झाला शासनाच्या प्रकल्पात कशी चोरी केली हे उघड करावयाचे आहे.

मोर्चातुन प्रश्न सुटून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई नाही झाल्यास, पात्र वंचित झोपडीधारकास सदनिका नाही मिळाल्यास, भाडे धनादेश नाही दिल्या आत्मदहनाचा इशाराही डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे दिला आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बंजारा सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाई शिवा राठोड आयोजित मोर्चा आंदोलनाचे अध्यक्ष कॅप्टन श्रावण गायकवाड असून नेतृत्व डॉ. राजन माकणीकर करत आहेत, या मोर्चाला पोलीसांनी परवानगी नाकारली असली तरी शेकडोंच्या संख्येने आंदोलन होणार आहे.

पोलिसांच्या माध्यमातून विकासक व महादलाल आंदोलनाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र लोकशाही संविधानिक मार्गाने आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला असून आंदोलन होणारच असा ठाम विश्वास डॉ माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.

आंबेडकरवादी हमारे जेब मे है! म्हणणाऱ्या मनूच्या पिलावळीच्या कानाखाली चपराक देण्यासाठी सज्ज असून अफवांचे पेव फुटले आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन ही डॉ. माकणीकर यांनी केले आहे.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...