Skip to main content

न्यूज अपडेट : डेब्रिज माफियांना लगाम घाला महापालिका आयुक्तांना मागणी:

न्यूज अपडेट : डेब्रिज माफियांना लगाम घाला महापालिका आयुक्तांना मागणी:

● यंदाही डेब्रिज झाकण्यासाठी हिरव्या कापडी जाळीचा आधार

● डेब्रिज कापडी जाळी ने झाकण्याची नामी शक्कल महनगरपालिकेने लढवली

● डेब्रिज माफिया शहारत कुठेही डेब्रिज खाली करतात आणि शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात

नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे)  :- बुडत्याला काडीचा आधार आणि स्वच्छ सर्वेक्षणात महापालीकेला जाळीचा अश्रू अशी गत आता नवी मुंबई महानगरपालिकेची झाली आहे. कारण सध्या  नवी मुंबई  शहरात  स्वच्छ सर्वेक्षण चे वारे वाहू लागले आहेत आणि यामुळे शहर अधिक स्वच्छ दिसावे म्हणून पालिकेने जोर दिला असून जागो जागी स्वच्छता सुरू आहे. मात्र काही ठीकाणी मोकळ्या भूखंडावर डेब्रिज मुळे दिसणारी अस्वच्छता झाकण्यासाठी पालिकेने मागील वर्षी प्रमाणे यंदाही कापडी जाळीचा आधार घेतला आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या डेब्रिजच्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील वर्षी पार पडलेल्या  स्पर्धेत नवी मुंबई शहराला  देशात स्वच्छ शहर म्हणून तिसऱ्या क्रमांकाचे नामांकण मिळाले आहे. त्यामुळे यंदा या  स्पर्धेत शहराला पहिल्या क्रमांकाचे नामांकन मिळावे म्हणून महानगरपालिकेने कंबर कसली आहे. आणि त्याकरिता पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत साफ सफाई ची कामे युद्ध पातळीवर सूरु आहेत. मात्र ही साफसफाई करताना शहरातील मोकळ्या भूखंडावर पडलेले डेब्रिज बाधा आणत आहेत. 

आज शहारत बऱ्याच ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी डेब्रिज माफियांकडून डेब्रिज रिते केले जाते. वास्तविक नवी मुंबईत डेब्रिज टाकन्यास मनाई आहे. मात्र डेब्रिज माफिया शहरा बाहेर डेब्रिज टाकण्यासाठी नवी मुंबई हद्द वाहतूक परवानगी अतिक्रमण विभागाकडून घेतात आणि याच परवानगीचा गैरफायदा घेत डेब्रिज माफिया चुकीच्या पद्धतीने शहारत डेब्रिज टाकतात आणि हे डेब्रिज टाकणाऱ्या वाहनांकडे अतिक्रमण विभाग आणी भरारी पथक अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात. त्यामुळे हे डेब्रिज माफिया शहारत कुठेही डेब्रिज खाली करतात आणि शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात. त्यामुळे डेब्रिज चे वाढते अतिक्रमण रोखण्यात पालिकेला चांगलेच अपयश आले आहे आणि शहरात डेब्रिज चे ढीग वाढत गेले आणि हेच डेब्रिज आता अस्वच्छ दिसू लागले आहे. 


स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आता केंद्रातून पथक येत आहेत आणि पाहणी दौऱ्यात डेब्रिज बाधा निर्माण करु शकते?त्यामुळे हे डेब्रिज कापडी जाळी ने झाकण्याची नामी शक्कल पालिकेने लढवली आहे. मात्र वेळीच जर या डेब्रिज माफियांना पालिका अधीकाऱ्यांनी लगाम घातला असता तर आज पालिकेवर स्वतःची नामुष्की झाकण्यासाठी ही वेळ आली नसती. त्यामुळे कडक  शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रचलित झालले मनपा मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी शहराला विद्रुप करणाऱ्या या डेब्रिज माफियांना लगाम घालावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नवी मुंबई ला प्रथम क्रमांक मिळाले तर ती नवी मुंबईकरांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट असेल. मात्र शहारत अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने जागो जागी पडलेले डेब्रिज हे शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करत आहेत. त्यामुळे प्रथम या डेब्रिज माफियांना मनपा आयुक्तांनी लगाम घातली पाहीजे, तरच शहर सुंदर दिसण्याकडे वाटचाल करेल आणि प्रथम क्रमांक पटकावेल.

गोविंद साळुंखे (सामाजिक कार्यकर्त)





महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...