Skip to main content

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील सोसायट्यांना कचरा वर्गीकरण; विल्हेवाटीचे निर्देश:

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील सोसायट्यांना कचरा वर्गीकरण; विल्हेवाटीचे निर्देश:

● सहकारी संस्था सहनिबंधकांचे नवी मुंबईतील सोसायट्यांना कचरा वर्गीकरण.

● कुजणारा किंवा ओला व न कुजणारा किंवा सुका आणि घरगुती धोकादायक असा कचरा वर्गीकृत करणे. 

● तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या व्यक्तीकडे / एजन्सीकडे देणे बंधनकारक असेल.

नवी मुंबई (प्रतिनिधी/उमेश खांदेकर) :- नवी मुंबई क्षेत्रामध्ये सिडको भूखंडावरील सर्व सहकारी गृहनिर्माण / प्रिमायसेस संस्थांच्या व्यवस्थापक समितीला सहनिबंधक सहकारी संस्था, सिडको, नवी मुंबई यांचे सहनिबंधक डॉ. केदारी जाधव यांच्या वतीने, महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960 चे सुधारीत कलम 154 (ब) (27) (1) नुसार, सुका, ओला व घरगुती धोकादायक कचरा स्वतंत्रपणे देणे त्याचप्रमाणे 50 किलोपेक्षा जास्त दैनंदिन कचरा निर्मिती होते अशा संस्थांनी संस्थेच्या आवारातच कम्पोस्ट करणे बंधनकारक असल्याचे निर्देश 22 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेले आहेत.


केंद्र शासनाकडील अधिसूचना क्र. एस.ओ.1357, 8 एप्रिल 2016 अन्वये घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम 2016 लागू करण्यात आलेले आहेत. या नियमांतर्गत प्रत्येक कचरा निर्मात्या नागरिकांना विघटनशील (कुजणारा किंवा ओला) व अविघटनशील (न कुजणारा किंवा सुका) आणि घरगुती धोकादायक असा वर्गीकृत केलेला कचरा स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या व्यक्तीकडे / एजन्सीकडे देणे बंधनकारक आहे. 


या नियमाची प्रभावी अंमलबजावणी नवी मुंबई शहरामध्ये सुरु आहे.


त्यास अनुसरून सहनिबंधक सहकारी संस्था, सिडको, नवी मुंबई या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच प्रिमायसेस सहकारी संस्था यांनी घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम 2016 च्या नियमानुसार वर्गीकृत कचरा महानगरपालिकेने नेमून दिलेल्या व्यक्ती / एजन्सीकडे देणे बंधनकारक असल्याने तसेच ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत 50 किलो पेक्षा जास्त दैनंदिन कचरा निघतो अशा संस्थांनी संस्थेच्या आवारात कंपोस्ट करणे बंधनकारक असल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे निर्दशित केले आहे.


सहकारी गृहनिर्माण संस्था व प्रिमायसेस सहकारी संस्था यांचेकरिता सहनिबंधकानी निर्गमित केलेल्या या निर्देशपत्रात, आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच नवी मुंबई महानगरपालिकेला 'स्वच्छ सर्व्हेक्षण 2020' मध्ये महाराष्ट्रात पहिला व देशात तिसरा क्रमांक मिळालेला असल्याचे प्रामुख्याने नमूद केले असून प्रत्येकाने ओला, सुका व घरगुती धोकादायक अशा तीन प्रकारच्या कचरा वर्गीकरणाबाबत, आणि 50 किलोपेक्षा जास्त कचरा निर्मिती होते अशा गृहनिर्माण संस्थानी कचरा विल्हेवाटीबाबत, घनकचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करावे असे निर्देश दिलेले आहेत. यामुळे नवी मुंबईतील कचरा वर्गीकरण व कचरा विल्हेवाट कामाला गती लाभणार आहे. 






महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...