Skip to main content

न्यूज अपडेट : २५ डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन :

न्यूज अपडेट : २५ डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन :

लेख/माहीती :- २५ डिसेंबर १९२७ रोजी एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह परिषेदेत मनुस्मृतीचे जाहीर दहन केले .स्त्री शूद्रांच्या गुलामगिरीचे प्रतीक असणाऱ्या मनुस्मृतीचे दहन हा तत्कालीन परिस्थितीत सनातनी धर्ममार्तंडाना फार मोठा धक्का होता. समाजातील एका फार मोठया वर्गावर हजारो वर्षांपासून अलिखित मालकी गाजविण्याचा लिखित परवाना असलेली मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे दहन केली होती.

जेव्हा भारतीय राज्यघटना निर्मितीचे महान कार्य डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांवर सोपविण्याuत आले , तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्यायावर आधारित राज्यघटना निर्माण केली कदाचित उपेक्षित वर्गाला त्यांनी आजपर्यंत जे दुःख दैन्य - दास्य सहन केले आहे त्याची योग्य  ती परतफेड करण्याची संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गमवायची नव्हती. 

एकवेळी माता रमाईना लिहिलेल्या एका पत्रात डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , मी स्त्री मुक्तीसाठी व स्त्री उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे स्त्रियांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आवश्यक जो संघर्ष केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे खरे तर माणूस म्हणून आमचा विचार करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या माध्यमातून आमचा सर्वोपरी विचार करणाऱ्या डॉ.भीमराव रामजी आंबेडकरांचा अभिमान वाटतो.

या देशात अंधाराला प्रकाश म्हणण्याची सक्ती हिंदू धर्माकडून हजारो वर्षे झाली वर्ण श्रष्ठेत्वाची सगळी सूत्र हाती घेतलेल्या हिंदू धर्मातील एकही पढीक  विद्यावनाला स्त्री - शूद्रांवर मनुस्मृती मधून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावीशी वाटली नाही प्रकाश कधीही काळा नसतो हे सांगण्यासाठी तिचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या देशात डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या सूर्यालाच जन्म घ्यावा लागला.

प्रकाश स्वातंत्र्य देतो ,समता देतो प्रगती आणि विकास देतो हे सांगण्यासाठी हिंदू धर्मावर डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी केलेला प्रहार म्हणजेच आंधरयुगाचा अंत असलेला मनुस्मृती दहन दिन होय.


(भीम आर्मी- भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य)

मुंबई प्रचार प्रसिद्धी प्रमुख

मा.सागर कांबळे ( पत्रकार )






महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...