Skip to main content

न्यूज अपडेट : सिडको जनरल मॅनेजर व सिटी अधिकारी यांच्यासोबत विजय साळे यांची बैठक संपन्न झाली:

न्यूज अपडेट : सिडको जनरल मॅनेजर व सिटी अधिकारी यांच्यासोबत विजय साळे यांची बैठक संपन्न झाली:

नवी मुंबई (बातमी/रुपाली वाघमारे) :- नवी मुंबई सिडको मुख्यालयात जाऊन मा. विजय साळे यांनी सिडको जनरल मॅनेजर व सिटी अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन. नवी मुंबईतील वाशी, सानपाडा, जुईनगर, उलवे, खांदेश्वर येथे बांधण्यात येणाऱ्या घरांन संदर्भात चर्चा करून नागरिकांना होणाऱ्या अडचणी व त्रास या बद्दलची देखील माहिती सिडको समोर त्यांनी यावेळी उपस्थित केली.

सिडको समोर मांडण्यात आलेले मुद्दे:


●  लॉटरी लागलेली असतानाही काही कारणस्थ पेपर बाकी असलेल्या घरांचे प्रलंबित अर्ज निकालात काढणे.

● प्लॉटची ऑनलाईन बोली विक्री बंद करावी आणि ऑफलाईन करून अडिशनल मेबरचा ऍड (Additional Member Add) करता येणार नाही असा कॉज (cause) टाकावा तेव्हाच तो प्लॉट सर्व सामान्य नागरिकांना मिळू शकेल.

● सिडको कडून विक्रीविना पडलेले भूखंड साफसफाई करून घेणे.

● सिडको ने सोशल वेल्फेअर प्लॉट नवी मुंबई महानगरपालिका यांना लवकरात लवकर हस्तांतर करणे.

● नागरी निवारा केंद्राची काम करणाऱ्या व्यक्तीची क्षमता वाढवणे कारण लॉटरी लागलेल्या घरांच्या बद्दल काही माहिती घ्यायची असल्यास फोन सारखा व्यस्थ असा येतो आणि निवारा केंद्रात नागरिकांना २ तास वाट पहावी लागते

● नवी मुंबई क्षेत्रातील उर्वरीत घरांची लॉटरी लवकरात लवकर काढावी (जुईनगर, सानपाडा, खारघर, उलवे)

● नवीन घरांन साठी फ्रॉम ( Form) भरताना काही अटी शिथिल कराव्यात उदा. उत्पनाचा स्लॅब वाढवावा तो वाढला तरच बॅंका लोन देऊ शकतील.

● कान्व्हेंस डिड (Convinced did) बद्दल सिडकोची भूमिका काय आहे ते स्पष्ट करावे.

● या पुडील धोकादायक इमारतीचे बांधकाम (पुनर बांधकाम/ Redevelopment ) सिडकोने करावी.

● मा . प्रांतप्रधान आवास योजने अंतर्गत जाणा घरे लागली आहेत त्यांचे स्टॅम्प ड्युटी , रजिस्ट्रेशन सिडको ऑफिस मध्ये किंवा ऑनलाईन कसे होईल या कडे लक्ष द्यावे.

● प्रत्येक साईट इस्टेट ऑफिस मध्ये नागरिकांचे काम कसे लवकरात लवकर होईल या कडे लक्ष द्यावे.

● नवीन नवी मुंबई वाशी, सानपाडा, जुईनगर, उलवे, खांदेश्वर येथे बांधण्यात येणाऱ्या घरांन संदर्भात चर्चा करण्यात आली.

वरील विषय अधिकारी वर्गाने काळजीपूर्वक ऐकून लवकरात लवकर या वर मार्ग काडून नागरिकांना कसा दिलासा देता येईल यावर लवकर मार्ग काढावा असे विजय बाबासाहेब साळे यांनी सांगितले आहे.




महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...