Skip to main content

न्यूज अपडेट : ब्रिटनहून परतलेल्या उल्हासनगर येथील १२ नागरिकांपैकी एका मुलीचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह':

न्यूज अपडेट : ब्रिटनहून परतलेल्या उल्हासनगर येथील १२ नागरिकांपैकी एका मुलीचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह':

नवी मुंबई (उल्हासनगर/प्रतिनिधी) :- उल्हासनगर येथे परतलेल्या १२ नागरिकांची यादी दोन दिवसांपूर्वी पाठवण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार उल्हासनगर महापालिकेने ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची चाचणी सुरू केली आहे. या १२ नागरिकांपैकी एक सात वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ठाणे - कल्याण डोंबिवली पाठोपाठ उल्हासनगर महापालिकेलादेखील ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांचा शोध घ्यावा लागत आहे. उल्हासनगर येथे परतलेल्या १२ नागरिकांची यादी दोन दिवसांपूर्वी पाठवण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार उल्हासनगर महापालिकेने ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची चाचणी सुरू केली आहे. या १२ नागरिकांपैकी एक सात वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्याĺ आरोग्य विभागाने दिली आहे. या बाधित मुलीची प्रकृती स्थिर असून ती कुटुंबासह ७ डिसेंबर रोजी उल्हासनगर येथे नातेवाईकांकडे आली होती. तिच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बाधित मुलीला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट जीन टेस्ट (जनुकीय रचना) तपासणीसाठी मुंबईतून पुण्याच्या एनआयव्ही येथे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर 'युकेचा स्ट्रेन' आहे की नाही, या तपासणीसाठी सॅम्पल पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

४ दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवलीतील २ महिला देखील पॉझिटिव्ह :

विमानतळावर प्रवाशाची सर्व माहिती गोळा करून त्या त्या महापालिकांना या प्रवाशाची माहिती पाठवत प्रवाशांच्या स्वॅबची तपासणी करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत ५५ नागरीक ब्रिटनहून आल्याची यादी शासनाकडून धाडण्यात आली. या नागरिकांची नावं, पत्ते, फोन नंबरची यादी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे धाडण्यात आली असून या नागरिकांना संपर्क करून त्यांची पुन्हा टेस्टिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तपासणी करण्यात आली. महिला प्रवासी पॉझिटिव्ह आल्याने तिचे जीन टेस्टिंगसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

नव्या विषाणूला रोखण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू:

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूने थैमान घातल्यानंतर हा विषाणू भारतात पसरू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय विमानं सुरू असल्याने ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकाची संख्या मोठी आहे. या नागरिकांची विमानतळावर उतरल्यानंतर तपासणी करत लक्षणे आढळणऱ्यांना विलगीकरणात पाठवले जात आहे. ज्या प्रवाशांना लक्षणे नाहीत, त्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला जात आहे.





महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...