Skip to main content

न्यूज अपडेट : महामंडळावर आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाला स्थान द्यावे;डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट : महामंडळावर आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाला स्थान द्यावे;डॉ. राजन माकणीकर:

नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :- महामंडळ वाटपा वेळी महाविकास आघाडी सरकारला आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा विसर पडायला नको, अन्यथा आगामी निवडणुकीत आघाडीची बिघाडी करायला वेळ लागणार नाही असा टोला डॉ. राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना लगावला.

विधानसभा व लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत युती करून निवडनुक लढवून मताधिक्याने काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला निवडून आणण्यात आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाची म्हत्वापूर्ण भूमिका बजावली आहे.

कुठल्याही अतिशर्थी ना ठेवता बिनशर्त आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाने आघाडी सरकारला मदत करून सत्तेत बसवले आहे. सत्तेतील घटक पक्ष या नात्याने सत्तेत भागीदारी असूनही कोणता अट्टाहास धरला नाही. 

डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मागणीचा सूर येत असून महामंडळ वाटप करतांना आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा विसर पडू नये. 

आंबेडकरी जनतेत प्रचंड लोकप्रियता मिळवत असलेले युवा नेते कनिष्क कांबळे व त्यांचा पक्ष भविष्यातील सत्तांतरणाच्या दिशेने वाटचाल करत असून नवी ताकत पक्षाला लाभत आहे.

विधान परिषदेवर घेत असलयाचे सांगून यादीत नावे फिरवून शेवटी निराशा हाती दिली, महामंडळाच्या बाबतीत तर पुनरावृत्ती घडली तर महापालिकेच्या राजकारणाचे चित्र नक्कीच बदलेल आणि महाघाडीच्या सरकारला हार पत्करावी लागेल.

यामुळे महामंडळ वाटप करतांना युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नावाचा विसर पडता कामा नये अन्यथा महापालिकेत आघाडी ची बिघाडी करण्यात आरपीआय कमी पडणार नाही याची नोंद घेण्याचा इशाराही यावेळी राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिला.

सदर विषयी लवकरच राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रवक्ता वसंत कांबळे यांच्या नेतृत्वात कॅ. श्रावण गायकवाड, भाई शिवा राठोड, डॉ. राजन माकणीकर, प्रदेशद्याक्ष हरिभाऊ कांबळे, राज्य निरीक्षक बळवंत पाटील आदींचे शिस्तमंडल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचीही माहिती डॉ माकणीकर यांनी दिली.





महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...