Skip to main content

न्यूज अपडेट : रंगचित्रांतून साकारल्या नागरिकांच्या मनातील स्वच्छ नवी मुंबईच्या संकल्पना..!!

न्यूज अपडेट : रंगचित्रांतून साकारल्या नागरिकांच्या मनातील स्वच्छ नवी मुंबईच्या संकल्पना..!!



नवी मुंबई (प्रतिनिधि/किरण पवार) :- स्वच्छतेमध्ये लोकसहभागाचे महत्व अनन्यसाधारण असून प्रत्येक माणसाने स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून स्वच्छता ही आपल्या दैनंदिन जगण्याची नियमित सवय करून घ्यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत.


यामध्ये नवी मुंबईकरांच्या स्वच्छताविषयक कलात्मक जाणीवांना भक्कम व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व भित्तीचित्र / म्युरल्स स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजात ढोले आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दोन्ही स्पर्धांच्या ठिकाणी भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. 



वंडर्स पार्क नेरूळ येथे संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी माजी सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे उपस्थित होते. वंडर्स पार्क येथील चित्रकला स्पर्धेत १० ते १५ वयोगटातील ५७ तसेच १५ वर्षावरील ९ स्पर्धकांनी सहभागी होत 'स्वच्छ भारत - स्वच्छ नवी मुंबई' संकल्पनेवर आधारित आपल्या भावना चित्ररूपांत साकारल्या. कोव्हीडच्या काळातील निरूत्साही वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ही चित्रकला स्पर्धा उपयोगी ठरल्याची भावना अनेक स्पर्धकांनी व्यक्त केली.


सेक्टर १६, वाशी येथील नाला पार्कींग लगतच्या भिंतीवर भित्तीचित्र काढणे स्पर्धेमध्ये २० चित्रकारांनी सहभागी होत स्वच्छतेच्या विविधरंगी भावना भित्तीचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या. स्वच्छतेत अग्रणी असलेल्या नवी मुंबई शहराचा नावलौकिक उंचविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हेच जणू या चित्रकारांनी आपल्या भित्तीचित्रातून स्पष्ट केले. 'निश्चय केला - नंबर पहिला' हे ध्येय नजरेसमोर ठेवून 'स्वच्छ सर्वेक्षण - २०२१' ला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असून प्रतिभावंत कलाकार नागरिकांच्या मनातील स्वच्छतेची संकल्पना साकारण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्राशी संबंधित या दोन्ही स्पर्धा कोव्हीडच्या काळातही नागरिकांचे अंगभूत कलागुणांना मुक्त व्यसपीठ मिळवून देणा-या ठरल्या तसेच यामधून नागरिकांच्या मनातील स्वच्छ नवी मुंबईचे चित्रदर्शनही यामधून घडले. 



स्पर्धेच्या आयोजन कार्यात श्रीम. धनश्री देसाई आणि श्री. रोहित शास्त्री यांचे महत्वाचे योगदान लाभले. 


 


 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...