Skip to main content

न्यूज अपडेट: एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीचा सर्वाधिक फायदा हा नवी मुंबई:

न्यूज अपडेट: एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीचा सर्वाधिक फायदा हा नवी मुंबई:



नवी मुंबई (प्रतिनिधि/उमेश खांदेकर) :- मुंबई वगळता राज्यातील सर्व शहरांसाठी लागू करण्यात येणाऱ्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीचा सर्वाधिक फायदा हा नवी मुंबई शहराला होणार आहे. सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव अडीच चटई निर्देशांक दिला होता. त्यात आणखी अध्र्या वाढीव एफएसआयने भर पडल्याने गेली २५ वर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे या इमारतींचा विकास करण्यास विकासक धजावणार आहेत.


याशिवाय खासगी इमारतींनाही ही नवीन एकात्मिक विकास नियंत्रण निययावली लागू होणार असल्याने त्यांच्या विकासाचा मार्ग खुला होत आहे. झोपडपट्टी पुनर्विकासही चार एफएसआयने होणार असून नवी मुंबईतील पूर्व बाजू ही झोपडपट्टीयुक्त आहे. नवी मुंबईत या तिन्ही प्रष्टद्धr(२२४)नाांचे घोंगडे गेली अनेक वर्षे भिजत पडले आहे.


राज्यातील शहरांचे नागरीकरण वाढत आहे. त्यांचा विकास सुनियोजित होऊन एफएसआयची चोरी होऊ नये यासाठी राज्य सरकार गेली तीन वर्षे महानगरांसाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली तयार करीत होते. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. गेली अनेक वर्षे वाढीव एफएसआयच्या प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबईला या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीचा फायदा होणार आहे.


वाशी येथील जेएनवन, जेएनटू प्रकारातील इमारतींच्या प्रश्नांवरून गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रष्टद्धr(२२४)न सोडविताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींना अडीच एफएसआय मंजुर केला होता. पण या वाढीव एफएसआयने शहरात एकही इमारत उभी राहू शकली नाही. अडीच एफएसआयमध्ये मोक्याच्या इमारती वगळता आतील भागात असलेल्या इमारतींचा विकास करण्यास विकासक पुढे येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या इमारतींना वाढीव एफएसआय मिळावा अशी मागणी होत होती. ती या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे पूर्ण झाली आहे. तीन एफएसआयमुळे या इमारतींचा विकास होणार असून टोलेजंग इमारती नवी मुंबईच्या सिडको नोडमध्ये उभ्या राहणार आहेत. 


नवी मुंबई विमानततळ प्रभावित क्षेत्रातील उंचीच्या मर्यादेमुळे या इमारतींची काही ठिकाणी उंची कमी करावी लागणार आहे. पालिकेला हे अधिकार मिळावेत यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत, मात्र एमआयडीसी आपल्या जागेवरील हा विकास आणि त्यामुळे होणारा फायदा दुसऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यास तयार नाहीत. शासकीय, खासगी, आणि एमआयडीसी जागेवरील या विकास नियंत्रण नियमावलीच्या विकासामुळे हे शहर पुन्हा कात टाकणार असल्याचे विकास नियंत्रण नियमावलीचे अभ्यासक माजी नगरसेवक किशोर पाटकर यांनी सांगितले. सिडकोच्या वतीने १०० ते १५० पर्यंतचे भूखंड विक्री केली जाते.
पुनर्विकास मार्गी


नवी मुंबई स्थापनेला आता ५० वर्षे झालेली असल्याने येथील खासगी इमारतीदेखील मोडकळीस आलेल्या आहेत. त्यांना या विकास नियंत्रण नियमावलीचा फायदा होणार असून वाढीव एफएसआयने पुनर्विकास करता येणार आहे.


र्व बाजूस असलेल्या ४७ हजार झोपडय़ांचा चार एफएसआयने विकास होणार असून तो एमआयडीसी करणार आहे.


 


 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...