Skip to main content

न्यूज अपडेट : नवी मुंबईत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान:

न्यूज अपडेट : नवी मुंबईत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान:


१ ते १६ डिसेंबर २०२० या कालावधीत “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान” नमुंमपा कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार


२९१ पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे,


१,०१,६९८ घरातील ३,४२,६४५ लोकसंख्येला भेटी देऊन नागरिकांची तपासणी करणार



नवी मुंबई (रूपाली वाघमारे)  :- समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधून त्यांना उपचाराखाली आणणे तसेच कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने  केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक १ ते १६ डिसेंबर २०२० या कालावधीत “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान” नमुंमपा कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.


नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर याच्या मार्गदर्शनाखाली, ही मोहीम राबविण्यात येत असून याकरिता २९१ पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. ही पथके १,०१,६९८ घरातील ३,४२,६४५ लोकसंख्येला भेटी देऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत तसेच कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत माहिती प्रसारण आणि जनजागृती करणार आहेत. प्रत्येक पथक दररोज २५ घरांना भेट देऊन माहिती संकलन करणार आहे.


प्रत्येक पथकामध्ये एक महिला व एक पुरूष कर्मचारी असून घरातील महिलांची तपासणी महिला कर्मचाऱ्यामार्फत आणि पुरुषांची तपासणी पुरूष कर्मचाऱ्यामार्फत करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये कुष्ठरोगाकरिता त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/चकाकणारी‍ त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता न येणे अशा प्रकारची लक्षणे विचारुन तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे क्षयरोगासाठी दोन आठवडयांपेक्षा जास्त खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ अशा लक्षणांबाबत विचारणा करून तपासणी करण्यात येणार आहे.


यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास सदर व्यक्तीस वैदयकिय अधिकारी यांच्याकडे निदानाकरीता संदर्भित करण्यात येणार आहे. तर क्षयरोगाची लक्षणे आढळयास १ तासाच्या अंतराने दोन थुंकी नमुने घेण्यात येऊन एक्स रे करीता संदर्भित करुन तपासणीअंती निदान निश्चित करण्यात येणार आहे.
नमुंमपा कार्यक्षेत्रात यापूर्वी आढळेलेले रुग्ण विचारात घेऊन सर्वेक्षण कार्यक्षेत्राची निवड करण्यात आली आहे. यामध्ये झोपडपट्टी, बांधकाम मजूर, दगडखाणी इ. भागाचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यानुसार ३,४२,६४५ लोकसंख्येस २९१ पथकांव्दारे दिनांक ०१ ते १६ डिसेंबर २०२० दरम्यान भेटी दिल्या जाणार आहेत.



या अभियानाव्दारे समाजातील निदान न झालेल्या कुष्ठरुग्णांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराचा वापर करणे व यामधून संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे आणि कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे उद्दिष्टपूर्तीसाठी काम केले जाणार आहे. तसेच क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा प्रशिक्षित पथकाव्दारे शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे हे ध्येय साध्य करण्यात येणार आहे.


तरी नागरिकांनी या मोहिमांस प्रतिसाद देऊन लक्षणे जाणवल्यास स्वत:ची कुष्ठरोग तपासणी करुन घ्यावी तसेच क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास थुंकी नमुने देऊन अभियानाचे उद्दीष्ट साध्य करण्यात संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.


 


 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...