Skip to main content

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील कोविड-१९ टेस्टिंग सेंटर मधे घोटाळा; डॉ. सचिन नेमाणे यांना निलंबित करण्यात आले:

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील कोविड-१९ टेस्टिंग सेंटर मधे घोटाळा; डॉ. सचिन नेमाणे यांना निलंबित करण्यात आले:


नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पुढच्या तपासासाठी उपायुक्त योगेश कडूसकर नेतृत्वात एका तीन सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. आठवडाभरात अहवाल सादर करुन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.



नवी मुंबई (प्रतिनिधि/रुपाली वाघमारे) :- नवी मुंबईतील कोविड-१९ ची टेस्टिंग सेंटरमधील घोटाळा प्रकरणी शहराचे कोविड-१९ टेस्टिंग इन्चार्ज डॉ. सचिन नेमाणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी ही कारवाई केली आहे. यासोबतच पुढील तपासनीसाठी  आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून उपायुक्त योगेश कडूसकर नेतृत्वात एका ३ सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. आठवडाभरात अहवाल सादर करुन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील या प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.


कोरोना विषाणूचा प्रतिदिन प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तो रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रशासनाने जोरदार तयारी देखील केली आहे. हे सर्व एकीकडे सुरू असताना सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांमध्येही भ्रष्टाचार सुरू आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेलं वैद्यकीय तपासणी कक्षात हा घोटाळा उघडकीस आला आहे. कोरोना विषाणूची महाराष्ट्रात सुरुवात झाली तेव्हापासून याठिकाणी कोरोना रुग्णांची चाचणी करण्यात येत आहे. आजवर हजारो रुग्णांची तपासणी याठिकाणी करण्यात आली आहे. वरवर जरी हे सगळं ठीक दिसत असलं तरी हे एक भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे, हे असे सांगणे वावगे ठरणार नाही.


वृतास माहिती घेतली असता कळालं की एका मुलाची कोविड-१९ टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांची देखील नावे लिहून घेण्यात आली होती. वरकरणी हा सगळा प्रकार कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी केला गेला असेल असा आपला समज होईल. मात्र रोहित खोत या मुलाने सांगितलं की, मी माझी ९ ऑक्टोबरला कोरोनाची टेस्ट केली. त्यावेळी माझ्याकडून माझ्या कुटुंबियांची देखील नावे लिहून घेण्यात आली. त्यावेळी माझ्यासोबत कुणी नव्हतं. आमच्या घरातील कोणाचीही कोरोना टेस्ट करण्यात आलेली नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र माझ्याकडून नावे घेऊन त्यांची टेस्ट करण्यात आली असल्याचं दाखवण्यात आलं. पण खरच असा प्रकार होतोय का हे पाहण्यासाठी कोपरखैरणे विभागात राहणारे समाजसेवक अंकुश कदम यांनी काही डमी लोकांना विविध कोविड-१९ सेंटरमध्ये पाठवलं आणि समोर एक धक्कादायक प्रकार आला. 


विशाल कदम यांनी सांगितलं की, माझी आई मृत आहे. मी जाणूनबुजून माझ्या आईचं नाव दिलं. धक्कादायक म्हणजे तिची देखील यांनी कोरोनाची टेस्ट केल्याचा रिपोर्ट दिला आहे. ऋषिकेश रवले यांनीही तसंच केलं, त्यांनीही त्यांच्या वडिलांचं नाव दिलं. त्यांचे वडील जाऊन ८ वर्षे झाली होती आणि त्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. हा संपूर्ण प्रकार जर पहिला तर नक्कीच डोक्यात आणि मनात राग आल्याशिवाय राहणार नाही. हे हिमनगाचं टोक असून मागील ९ महिन्यांचा विचार केला तर मोठा भ्रष्टाचार समोर येण्याची देखिल शक्यता आहे.


तसेच त्यांनी संगितले की आम्ही अनेक कुटुंबियांना भेटलो आहे. यामध्ये एकाची कोरोना टेस्ट करून त्याच्या घरच्यांचे खोटे रिपोर्ट करण्यात आले आहेत. नवी मुंबई आयुक्तांची या प्रकरणी चौकशी व्हावी अन्यथा आम्ही आंदोलन करू, असं सामाजिक कार्यकर्ते अंकुश कदम यांनी सांगितलं. तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलं.


 


 


 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...