Skip to main content

न्यूज अपडेट :- एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा दुजोरा देणारे आणि त्यांच्या जाण्याने पक्षाचे फार काही बिघडणार नाही..!!

न्यूज अपडेट :- एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा दुजोरा देणारे आणि त्यांच्या जाण्याने पक्षाचे फार काही बिघडणार नाही..!!



नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- अखेर भाजपमधील आणखी एका नाथाने पक्ष सोडून जाण्याचे जाहीर केले. खरं तर राजकीय पक्षाच्या जीवनात नेते जाणे-येणे सुरूच असते. मात्र खडसे यांचे भाजपातून जाणे रावसाहेब दानवे म्हणतात इतके सहज आणि सोपे घेण्यासारखे नाही. ही गोष्ट आज दानवे जाणून असले तरी त्यांना ती खुलेपणाने मान्य करणे शक्य नाही.


कारण ते आज जरी सुपात असले तर उद्या जात्यात असतील, अशीच स्थिती आहे. असो. खडसे यांच्या राजीनाम्याचा दुजोरा देणारे आणि त्यांच्या जाण्याने पक्षाचे फार काही बिघडणार नाही, असा आव आणणारे केशव उपाध्ये यांचेच बघाना हेच उपाध्ये गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या आगेमागे करायचे. बरं या अशा नेत्यांची पार्श्वभूमी काय…त्यांनी पक्षासाठी किती आणि कुठे, कशी झीज केली, त्यांचा जनाधार काय या गोष्टींना भाजपात आता महत्व राहिले नाही. मुंबई वगळता ज्याची राज्यात कुठेही ओळख नाही, त्याला विधानपरिषद विरोधी पक्षनेता, ज्यांनी आयुष्यात कधीही थेट निवडणूक लढविली नाही ( कोथरूडचा अपघात वगळता ) अशा चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश भाजपचे सूत्रे हलवायची. ही कोण लोक आहेत. कोणी म्हणेल ते बालपणापासून हाफचड्डी घालून शिबिर करत होते ( ते वाईट आहे असे नाही मात्र राजकीय जीवनात पुरेसेही नाही ) ..किंवा त्यांच्या सामाजिक समरसतेसाठीच्या अनेक कथा रंगवल्या जातील. ते किती काळ एका पदावर निष्ठेने राहिले, त्यांनी स्वतःची भाकरी बांधून प्रसार केला वगैरे ..वगैरे… मात्र या लोकांनी राजकीय पक्ष म्हणून भाजपसाठी खाल्लेल्या खस्ता, झेलल्या लाठ्या, भोगलेले तुरुंगवास किती आणि केव्हा हे विचारायचे नाही हे कसे चालेल. केवळ कॅमेऱ्यासमोर येऊन खोडसाळपणे बोलणे, इतरांचे जुनी उणीदुणी काढणे हेच पाहून आता राजकारणात स्थान दिले जाणार काय ?


ज्या गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हा परिषदेपासून राजकारण सुरु केले. ज्या एकनाथ खडसेंनी ग्रामपंचायतीपासून राजकीय धडे गिरविले, त्यांना तुम्ही ज्ञान पाजळणारे कोण ? असा सवाल विचारणे कुण्या एखाद्या राजकीय पक्षाची तळी उचलणे होऊ शकत नाही. मुंडे-खडसे यांना देण्यात आलेली वागणूक सर्वानी पहिली आहे,  आज माध्यमांसमोर येऊन खोडसाळ वृत्तीतून आम्ही त्यांना थांबविले, संवाद साधला असे म्हणणे निव्वळ ठोंगीपणा,  कोडगेपणाचा कळस आहे.


गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांनी हजारो कार्यकर्ते घडविले, अनेकांना आमदार-खासदार करण्याची त्यांची क्षमता होती… नगरसेवक म्हणूनही निवडून येऊ शकत नसताना केवळ पक्षाच्या करिष्म्यावर नेते झाल्याचे अनेकांचे भास भविष्यात उतरतील. एकनाथ खडसे भाजपातून गेले नाही तर त्यांना घालविण्यात आले. आज जर ते हयातीत असते तर स्व. गोपीनाथ मुंडे यांचेही हेच झाले असते. आता बारी ती पंकजावर आहे. विनायक मेटेंना बळ कोण देतेय, भाजपाची सत्ता असतांना विरोधीपक्षात असलेल्या धनंजय मुंडेंना बळ देत कुणी उभे केले, पंकजा समर्थकांची कोंडी कशी सुरू आहे. वंजारी समाजातून नवे नेतृत्व उभे करण्यासाठी कोणाला आणि कशाच्या बळावर खासदार-आमदार करण्यात आले. 


हे सर्व स्पष्ट असताना आता पंकजा मुंडेंवर काय वेळ येईल हे सांगाल ? कुण्या भविष्यकाराची गरज उरली नाही. असो भाजपचा विरोधक म्हणून नव्हे तर त्याने काय गमावलंय हे सांगण्याचा मी माझ्या अल्प ज्ञानानुसार प्रयत्न केला. गोपीनाथ आणि एकनाथ या दोन्ही नावामध्ये ‘नाथ’ होता,  हा नाथ आता भाजपमधून निघून गेलाय. मुंडे-फुंडकर -खडसे या तिघांची राजकीय कारकीर्द ऐनभरात असताना मला राजकारण कळायला लागले. आज या तीनही नावांनी जवळपास भाजपच्या राजकीय पटलावरून एक्झिट घेतल्याच्या विचारांनी मनात ”रामचंद्र कह गाये सियासे ऐसा कलयुग आयेगा ” हे वाक्य रुंजी घालत आहे.


 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...