Skip to main content

न्यूज अपडेट : स्वच्छताविषयक प्रोत्साहनासाठी स्वच्छ सोसायटी, हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, मार्केट स्पर्धेचे आयोजन..।।

न्यूज अपडेट : स्वच्छताविषयक प्रोत्साहनासाठी स्वच्छ सोसायटी, हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, मार्केट स्पर्धेचे आयोजन..।।



नवी मुंबई (प्रतिनिधि) :- स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान संपादन केलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ करीता देशात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा संकल्प केला असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यादृष्टीने वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. स्वच्छताविषयक कार्यात नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला सहभाग राहिल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने आपले मानांकन नेहमीच उंचावत नेलेले आहे. त्या अनुषंगाने या लोकसहभाग वाढीवर भर देण्यात असून त्याकरीता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.


सध्या कोव्हीड 19 च्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात असून वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींग राखणे अशा आरोग्य सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी  
नागरिकांचे विविध माध्यमांतून प्रबोधन करण्यात येत आहे. त्याच बरोबरीने स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन स्वच्छतेविषयी देखील व्यापक स्वरूपात माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती करण्यात येत आहे. 


रहिवाशांना कचरा वर्गीकरण व त्यावरील प्रक्रिया तसेच इतर स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करणे तसेच या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवून नागरिकांच्या स्वच्छताविषयक सवयींमध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत.


स्वच्छताविषयक चांगले काम करणा-या व्यक्ती, संस्था यांना प्रोत्साहित करणे व त्यामधून इतरांसाठी प्रेरणा निर्माण करणे याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'स्वच्छता स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे


(1) स्वच्छ हॉटेल, 
(2) स्वच्छ शाळा (खाजगी व नमुंमपा), 
(3) स्वच्छ गृहनिर्माण संस्था / RWA, 
(4) स्वच्छ मार्केट असोसिएशन, 
(5) स्वच्छ शासकीय कार्यालय आणि 
(6) स्वच्छ हॉस्पिटल 


अशा सहा प्रमुख गटांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
  
या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण (Source Segregation), कच-यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय, व्यवस्था, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा आणि कोव्हीड-19 आजाराचा  प्रसार रोखण्याकरीता करण्यात आलेल्या उपाययोजना व नियमांचे पालन असे विविध निकष गुणांकनाकरिता असणार आहेत.


या स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या संस्थांनी २६ ते ३० ऑक्टोबर २०२० या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज दाखल करावयाचा आहे. या स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन दि. ०२ ते २० नोव्हेंबर, २०२० या कालावधीत करण्यात येणार आहे.


या स्वच्छता स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना प्रोत्सहन मिळावे याकरीता विभाग स्तरावरून निवड करण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.२१ हजार, रु.१५ हजार व रु.११ हजार अशी रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह वितरित केली जाणार आहेत.


त्याचप्रमाणे महापालिका स्तरावरील विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.५१ हजार, रु.४१ हजार व रु.३१ हजार रोख बक्षिसे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र यांचेसह प्रदान केली जाणार आहेत.


स्वच्छ शाळा स्पर्धेच्या खाजगी व नमुंमपा दोन्ही गटांतील प्रथम व द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.१५ हजार व रु.११ हजार रोख बक्षिस तसेच स्वच्छ शाळा स्पर्धेच्या खाजगी व नमुंमपा दोन्ही गटांतील प्रथम व द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.२५ हजार व रु.२१ हजार रोख बक्षिस हे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपस्रासह प्रदान करण्यात येणार आहे.


स्वच्छ मार्केट करीता प्रथम व द्वितीय क्रमांक विजेत्या मार्केंटना अनुक्रमे रु.२५ हजार  व रु.२१ हजार रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहे.


स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शासकीय कार्यालय, स्वच्छ हॉस्पिटल व स्वच्छ प्रभाग या विभागातील प्रथम व द्वितीय विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.


लोकसहभागातून नवी मुंबई शहरात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी हा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून निकोप स्पर्धेतून नागरिकांना प्रेरणा मिळावी याकरिता आयोजित स्वच्छता स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान' व 'स्वच्छ नवी मुंबई मिशन' यशस्वीपणे राबविण्यात प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.



 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...