Skip to main content

न्यूज अपडेट : चार वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरातील इमारतीत:

न्यूज अपडेट : चार वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरातील इमारतीत:



नवी मुंबई (बातमी/रबाळे) :- रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील बाळाराम वाडी घनसोली येथे 18 सप्टेंबर रोजी एक अल्पवयीन मुलगा ओंकार वय 4 वर्ष हा राहत्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून सात ते आठ मिनिटांमध्ये हरविलेला होता. त्यानंतर दोन तासानी ओमकार याचा मृतदेह त्याच्या राहत्या इमारतीच्या पाठीमागे एका सुतळी गोणीमध्ये मिळून आला होता. त्याबाबत रबाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 263/2020 कलम 302, 363, 201भा. द. वि.  नोंद करण्यात आला आहे. 



घटनास्थळी मिळून आलेले परिस्थितीजन्य पुरावे, तपासादरम्यानचे भौतिक पुरावे, वेळेचा तपशील, मयत मुलाच्या सवयी, इमारतीमधील झडती मध्ये मिळून आलेल्या संशयीत  वस्तू यावरून गुन्हयातील  मयत मुलाच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलगी वय वर्ष 17 हीचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशय निर्माण झाला होता. सर्व तांत्रिक बाबी, भौतिक पुरावे परिस्थितीजन्य पुरावे हे ही नमूद अल्पवयीन मुलीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दर्शवत होते. परंतु नमूद अल्पवयीन मुलगी कोणतीही माहिती देत नव्हती. सदरचा गुन्हा घडल्यापासून आज पावेतो 23 दिवस नमूद अल्पवयीन मुली कडे नियमितपणे अतिशय संयमपुर्ण, वेगवेगळ्या भावनिक स्तरावर कौशल्यपूर्ण चौकशी करून तिचा अधिकाधिक विश्वास संपादन केला. वेगवेगळ्या युक्तीपुर्ण केलेल्या चौकशी मधून नमूद अल्पवयीन मुलीने सदर गुन्हयाची कबुली दिली आहे.


नमूद अल्पवयीन मुलीस ताब्यात घेऊन आज रोजी मा. बाल न्याय मंडळ यांच्या समक्ष हजर करून सदरचा संवेदनशील गुन्हा उघडकीस आणला आहे.










महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...