Skip to main content

न्यूज अपडेट : फक्त एका कॉलवर रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती:

न्यूज अपडेट : फक्त एका कॉलवर रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती:


कोरोना विषाणूवर दिलासादायक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत.



नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- कोरोना विषाणूवर दिलासादायक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे, आता रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती एका कॉलवर उपलब्ध होणार आहे.


ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांकावरही संपर्क साधून रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. 


राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरव विजय एफडीए आयुक्त अरुण उन्हाळे, दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज आणि उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी आणि  वितरक उपस्थित होते.



३० सप्टेंबरपर्यंत अजुनही इंजेक्शन उपलब्ध होणार:


या बैठकीमध्ये इंजेक्शनचा तुटवडा होऊ नये यासाठी महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा जास्तीत जास्त साठा उपलब्ध करावा, दुर्गम भागामध्ये रुग्णांसाठी सहज औषधे उपलब्ध होतील, त्या दृष्टीकोनातून वितरण व्यवस्था राबवण्यात यावी, असे निर्देश शिंगणे यांनी उत्पादक कंपन्यांना दिले. त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शन कुठे किती प्रमाणात उपलब्ध आहे, त्याची किंमत किती आहे, याची माहिती रुग्णांना आणि नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी हेल्पलाईन क्रमांक किंवा पोर्टल सुरु करण्याचे निर्देश शिंणगे यांनी प्रशासनाला दिले. हेल्पलाईन सुरु झाल्यावर रुग्णांना इंजेक्शन माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राज्यामध्ये सध्या १५,७७९ इंजेक्शन उपलब्ध असून ३० सप्टेंबरपर्यंत सुमारे १,५०,२५६ इंजेक्शन उपलब्ध होतील अशी माहिती यावेळी उत्पादक आणि त्यांच्या वितरकांनी दिली.


रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी एफडीएच्या मुंबईतील मुख्यालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कार्यरत नियंत्रण कक्षामधून रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर मागणी आणि त्याची पूर्ततेसंदर्भातील माहिती आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध होणार आहे. सध्या प्रत्येक कोविड संशयित आणि कोविडग्रस्त रुग्णांस सुरवातीपासून रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येत असल्याने त्याची मागणी भरपूर वाढली आहे.  आरोग्य विभागाने टास्कफोर्समार्फत प्राटोकॉलप्रमाणे उपचार करताना रुग्णाची स्थिती बघूनच आवश्यक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करण्याचे निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांना दिल्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही आणि गरजू रुग्णांना ते उपलब्ध होतील या हेतुने परिपत्रक जारी करण्याबाबत आरोग्य विभागास कळवण्यात यावे, अशा ही सूचना उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या. 



ऑक्सिजन टँकरची संख्या वाढवणार:


रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा वापर सुध्दा वाढला आहे आणि दुर्गम भागातील काही जिल्हातील रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा बाबत आणि अनियमित पुरवठा बाबत तक्रारी येत आहेत. याकडे लक्ष वेधून उत्पादक आणि पुरवठादार यांनी दुर्गम भागातील रुग्णालयांना सुध्दा ऑक्सिजनचा पुरवठा नियमित व्हावा यासाठी टँकरची संख्या वाढविण्यात यावी आणि नियंत्रण कक्षाकडून होणारे निर्देशनानुसार पुरवठा करावा असे निर्देश अन्न व औषध विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंणगे यांनी दिले.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...