Skip to main content

न्यूज अपडेट : शहर स्वच्छतेमध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या स्वच्छता कर्मचा-यांचा गौरव..।।

न्यूज अपडेट : शहर स्वच्छतेमध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या स्वच्छता कर्मचा-यांचा गौरव..।।



नवी मुंबई :- स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात नेहमीच प्रथम व देशात सतत मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबईचा  नावलौकीक आहे. यामध्ये दररोज शहर स्वच्छ ठेवून नियमित योगदान देणा-या स्वच्छता कर्मचा-यांचा मोठा वाटा आहे. त्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा यथोचित सन्मान करणारा हा कार्यक्रम मनाला समाधान देणारा असल्याचे मत मांडत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी यापुढील काळात आपण सर्व मिळून अधिक जोमाने काम करूया आणि आपले मानांकन उंचवूया असा निर्धार व्यक्त केला.


नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने आयोजित स्वच्छताविषयक उल्लेखनीय कामगिरी करून नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवून देणा-या गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांच्या सत्कार समारंभप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या.



यावेळी अतिवृष्टीमुळे मागील वर्षी कोल्हापूर भागात उद्भवलेल्या आपत्ती प्रसंगात चांगली कामगिरी करणा-या स्वच्छताकर्मींचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, कार्यकारी अभियंता श्री. संजय देसाई, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. प्रल्हाद खोसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आपण करीत असलेल्या चांगल्या कामाची नोंद घेऊन करण्यात येणारा सत्कार हा आपल्याला अधिक चांगले काम करण्याची उमेद देणारा असतो असे सांगत या सत्कारातून प्रेरणा घेऊन आपण शहरासाठी अधिक चांगले काम करूया असे सर्वांना आवाहन केले. कोल्हापूरमध्ये जाऊन तेथे आपले शहर समजून काम केल्याने तेथील नागरिकांसह सर्वांनीच कौतुक केलेल्या नवी मुंबईतील स्वच्छताकर्मींच्या सर्वसमावेशक मनोभूमिकेची त्यांनी विशेष प्रशंसा केली.


कोल्हापूरला गेलेल्या ८० जणांच्या मदतकार्य पथकाचे प्रमुख कार्यकारी अभियंता श्री. संजय देसाई यांनी तेथील आव्हाने, संकटे व त्यावर जिद्दीने केलेली मात याबद्दलचे अनुभव कथन केले.



यावेळी ५ अधिकारी आणि १८० सफाई कर्मचारी यांचा भेटवस्तू व प्रशस्तिपत्रे देऊन सन्मान करण्यात आला. कोल्हापूरला गेलेल्या मदतकार्य पथकात उल्लेखनीय कामगिरी करणारे दिवंगत उप स्वच्छता निरीक्षक सत्यजित देवधर यांच्या पत्नीने त्यांच्या वतीने सन्मान स्विकारताना उपस्थितांनी उठून उभे रहात देवधरांच्या समर्पित कार्याला आदरांजली अर्पण केली.


अशा प्रकारे महानगरपालिकेमार्फत होत असलेला आमचा मानसन्मान मनाला आनंद देणारा असून यापुढील काळात अधिक चांगले काम करून नवी मुंबईला देशात आघाडीवर नेऊ असा निश्चय केला असल्याचे मत अनेक सफाई कर्मचा-यांनी व्यक्त केले.


 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...