Skip to main content

कोरोना अपडेट : हिंदुस्थानात एक असे झाड; राज्य सरकार करते लाखो खर्च व २४ तास सुरक्षा रक्षक तैनात:

कोरोना अपडेट : हिंदुस्थानात एक असे झाड; राज्य सरकार करते लाखो खर्च व २४ तास सुरक्षा रक्षक तैनात:


हिंदुस्थानात एक असे झाड आहे त्याला फक्त VIP नव्हे तर VVIP ट्रीटमेंट दिली जाते. या झाडाभोवती २४ तास पोलिसांचा पहारा असतो . इतकेच नाही तर या झाडाच्या देखभालीसाठी वर्षाकाठी १२ ते १५ लाख रुपये खर्च केला जातो . 



नवी मुंबई (भोपाळ) - देशाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात असतात आणि ते सीमेवर पहारा देत देशाची दिवसरात्र सुरक्षा करतात. फक्त देशच नाही तर व्हीआयपी मंडळींसाठी म्हणजेच अतिविशेष व्यक्तींसाठी २४ तास सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात असतात . पण हिंदुस्थानात एक असे झाड आहे त्याला फक्त VIP नव्हे तर VVIP ट्रीटमेंट दिली जाते. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि विदीशा दरम्यान सलामतपूरमध्ये एक झाड आहे . या झाडावर राज्य सरकार १२ ते १५ लाख रुपये खर्च करते अशी माहिती मिळाली आहे . इतकेच नाही तर या झाडाच्या सुरक्षेसाठी २४ तास पोलीस तैनात असतात . या झाडाच्या संरक्षणासाठी भोवताली १५ फूट जाळी लावण्यात आली आहे .


या झाडाला पाणी देण्यासाठी स्थानिक नगरपालिकेकडून एका पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे . या झाडाला कुठलीही रोगराई किंवा कीड लागू नये म्हणून कृषी अधिकारी दर आठवड्याला एक दौरा करतात. या झाडाची संपूर्ण देखभाल जिल्हाधिकारी करतात. या झाडाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांसाठी एक पक्का रस्ताही शासनाने बनवला आहे. 


आता वाचकांना प्रश्न पडला असेल की एका झाडाची एवढी काळजी का घेतली जाते ? एका झाडाला एवढी VVIP ट्रीटमेंट कशासाठी ? तर हे झाड श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी लावले होते. हे झाड साधेसुधे नसून गौतम बुध्दांना ज्या झाडाखाली मोक्ष प्राप्त झाली होते, त्या झाडाची फांदी रोवण्यात आली होती. या फांदीचे रुपांतर आता वृक्षामध्ये होऊ लागले आहे. हे झाड म्हणजे गौतम बुद्धाच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जात असल्याने या झाडाची इतकी काळजी घेतली जाते .



झाडाला कीड लागल्यानंतर माणसासारखी काळजी घेतली गेली फेब्रुवारी महिन्यात हे झाड आजारी पडलं होतं, म्हणजेच त्याच्यावर रोग पडला होता. वातावरणातील बदल आणि किड्यांमुळे झाडाची पाने काळी पडायला लागली होती आणि त्यांना भोकेही पडायला लागली होती. झाड आजारी पडल्याने चिंतेचं वातावरण पसरलं होतं. तत्काळ तज्ज्ञांना बोलावण्यात आलं आणि झाडावर इलाज सुरू करण्यात आले. माणसाला ज्या पद्धतीने इंजेक्शन आणि सलाईन लावली जाते, त्याच पद्धतीने झाडाला इंजेक्शन देण्यात आली आणि सलाईनही लावण्यात आली. हे झाड ८ वर्षांपूर्वी लावण्यात आलेलं आहे. राजपक्षे यांनी २१ सप्टेंबर २०१२ रोजी हे रोपटे लावले होते . भूतानचे तत्कालीन पंतप्रधान जिग्मी योजर थिंगले हे देखील यावेळी उपस्थित होते. हे छाटेसे रोपटे आता डेरेदार वृक्षात बदलायला सुरूवात झाली असून हे झाड आता २० फूट उंच झाले आहे .


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा


 


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...