Skip to main content

कोरोना अपडेट : आता मुंबई एअरपोर्टनंतर नवी मुंबई विमानतळ गेले अदानी समूहाच्या घशात..!!!!

कोरोना अपडेट : आता मुंबई एअरपोर्टनंतर नवी मुंबई विमानतळ गेले अदानी समूहाच्या घशात..!!!!


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे २२६८ हेक्टर जागेरव सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ उभारले जात आहे.



नवी मुंबई (विशेष/प्रतिनिधि) : देशाभरातील ६ विमानतळांच्या व्यवस्थापनाचा ठेका असलेल्या अदानी ग्रुपने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ७४ टक्के भाग खरेदी करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सुत्राकडुन समजते. तसे झाल्यास मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (मिआल) या जीव्हीके समूहाच्या कंपनीचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. परिणामी, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळसुद्धा अदानी ग्रुपच्या घशात जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे २२६८ हेक्टर जागेरव सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ उभारले जात आहे. या विमानतळाचे कंत्राट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणार्या जीव्हीके समूहाला देण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि मिआल या दोन्ही कंपन्या जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग कंपनीच्या उपकंपन्या आहेत. तर सिडको नोडल एजेन्सी म्हणून या प्रकल्पाचे काम पाहणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेल्यास जीव्हीकेची उपकंपनी असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अर्थात मिआलचे अधिकारही संपुष्टात येणार आहेत. त्याचा थेट परिणाम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंत्राटावर होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.



दरम्यान, उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीनंतर शासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी जीव्हीके कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे असा कोणताही बदल झाल्यास जीव्हीकेने सिडकोला कल्पना देणे गरजेचे आहे. तसेच त्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घेणेसुद्धा तितकेच बंधनकार आहे. परंतु आतापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही बदलाची जीव्हीकेकडून माहिती प्राप्त झाली नसल्याचे सिडकोच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले. जीव्हीके आणि सिडकोबरोबर झालेल्या करारातील तरतुदी तपासून पाहिल्या जातील. सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी तपासूनच शासनाच्या मंजुरीनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही या सूत्राने स्पष्ट केले आहे.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...