Skip to main content

कोरोना महासंकट : पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन २९ रूग्ण; २ जणांचा मृत्यू, ११ जणांना घरी सोडण्यात आले: 

कोरोना महासंकट : पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन २९ रूग्ण; २ जणांचा मृत्यू, ११ जणांना घरी सोडण्यात आले: 


पनवेल : पनवेल ग्रामीण भागात २६ जून रोजी कोरोनाचे नवीन २९ रूग्णांची नोंद झाली असून ११ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे नेरे येथील ३५ वर्षीय व्यक्तीचा २३ जून रोजी तसेच विचुंबे येथील ६२ वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, आज नोंद झालेल्या रूग्णांमध्ये नेरे येथील ९, विचुंबे येथील ५, आदई येथील ४, उलवे येथील ४, कोन, आजिवली, वाकडी, कंरजाडे, बारापाडा, केळवणे, उसर्ली येथील प्रत्त्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण ५२५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण ३०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाच्या २०६ ऐक्टिव केसेस चालू आहेत.



नेरे मध्ये कोरोनाचे नवीन ९ रूग्ण :
नेरे, ब्राह्मण आळी, माथेरान रोड येथील ६ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ४२ वर्षीय, ११ वर्षीय, २८ वर्षीय, ३० वर्षीय, ३५ वर्षीय, ३१ वर्षीय व्यक्तिंचा समावेश आहे. याशिवाय नेरे येथील १५ वर्षीय मुलीसह २५ वर्षीय आणि २८ वर्षीय व्यक्ती असे एकूण ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.


विचुंबे मध्ये कोरोनाचे नवीन ५ रूग्ण :
विचुंबे, सी २१०, रमेश निवास येथील ६२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच विचुंबे, कृष्ण वंदन, डी- विंग येथील ५५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती मुंबई महापालिकेत कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय विचुंबे, १०४ डी विंग, प्रयाग आकृती, पोलीस चौकीजवळील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच विचुंबे, म्हात्रे आळी, समाज मंदिराजवळील ३५ वर्षीय महिलेसह ४५ वर्षीय पुरूष कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.


आदई मध्ये कोरोनाचे नवीन ४ रूग्ण :
आदई, ए-१०२, बालाजी रेसिडेन्सी, येथील ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून माझगाव डॉक येथे कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच आदई येथील २८ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय आदई, ओमकार ब्राम्हण आळी, ५० वर्षीय महिलेसह ५० वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


उलवे मध्ये कोरोनाचे नवीन ४ रूग्ण :
उलवे, सेक्टर-१७ मधील ३५ वर्षीय महिलेसह ४८ वर्षीय आणि ४० वर्षीय पुरूष अशा एकूण ३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच उलवे, सेक्टर-२३, ओम साई सृष्टी येथील ३३ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.


कोन, आजिवली, वाकडी, कंरजाडे, बारापाडा, केळवणे, उसर्ली मध्ये कोरोनाचे नवीन रूग्ण:
कोन(पेठ) येथील ३१ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच आजिवली घर नंबर-१५२, येथील ३५ वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह आली असून नवीन पनवेलमध्ये मोबाईलच्या दुकानात काम करत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय वाकडी, प्लॉट नं-१०२, बी ग्रीन आर्केड येथील १९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून ड्रायव्हर म्हणून कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच कंरजाडे, रूम नं-१०३, मायक्रोपोल बिल्डिंग येथील ३२ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय बारापाडा (तारा) येथील ६९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची कोरोनाची लागण झाली असून विटभट्टी येथे काम करणाऱ्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच केळवणे, रूम नंबर-९१७ कोकण स्कूल जवळील २३ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय उसर्ली, बालाजी आर्केड, डी-विंग येथील २५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून बँक कर्मचारी असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


पनवेल ग्रामीण भागात २ जणांची मृत्यूंची नोंद :
पनवेल ग्रामीणमधील नेरे येथील ३५ वर्षीय व्यक्तीचा २३ जून रोजी मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याशिवाय विचुंबे येथील ६२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज (शुक्रवार, २६ जून) मृत्यू झाला आहे.


पनवेल ग्रामीणमधील ११ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले :
आज पनवेल ग्रामीणमधील ११ रूग्ण पुर्णपणे बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये विचुंबे येथील २, उलवे येथील २, उसर्ली येथील २, बेलपाडा, पळस्पे, नेरे, देवद, नेवाळी, कोप्रोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे



 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...