Skip to main content

कोरोना महासंकट : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला १० वारकऱ्यांसह आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना; पोलीस आणि आरोग्य पथक सहभागी असणार:

कोरोना महासंकट : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला १० वारकऱ्यांसह आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना; पोलीस आणि आरोग्य पथक सहभागी असणार:


श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी बस मध्ये ठेऊन ३० जूनला पालखी महामार्गाने पंढरपूरला घेऊन जाणार, यामध्ये सहभागी असणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना विषाणू तपासणी केली जाणार असून फक्त १० जणांनाच जाण्यास परवानगी मिळणार आहे. त्यासोबत पोलीस आणि आरोग्य विभागाचेही पथक सोहळ्याबरोबर असणार आहे.



नवी मुंबई (बातमी-देहूगाव) : यंदाच्या २०२० च्या आषाढीवारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी बस मध्ये ठेऊन ३० जूनला पालखी महामार्गाने पंढरपूरला घेऊन जाणार आहेत, यामध्ये सहभागी असणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना विषाणू तपासणी केली जाणार असून फक्त १० जणांनाच जाण्यास परवानगी मिळणार आहे. त्यासोबत पोलीस आणि आरोग्य विभागाचेही पथक सोहळ्याबरोबर असणार आहे.


राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने यंदा वारकरी संप्रदायाने आषाढी पायी वारी सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आषाढीवारीसाठी विविध संताच्या पालख्या पंढरपूरला येतात. संतांच्या पादुका घेऊन ३० जूनला दशमीच्या दिवशी दुपारी वाखरीत येतील तेथून सर्व पालख्या पंढरपूमध्ये प्रवेश करणार आहेत.



श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका ३० जुन रोजी पहाटे सहाच्या सुमारास १० वारकऱ्यांसह पंढरपूकडे रवाना होणार आहेत. त्यासाठी शासनाने विषेश बसची व्यवस्था केली आहे. पालखीला घेऊन जाणाऱ्या बसला फुलांची सजावट हेणार असून कापूर ओढ्या जवळ असलेल्या अनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती होईल. यानंतर दुसरी अभंग आरती चिंचोलीत होईल, आरती झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाईल. रोटी घाटात सकाळी ९ च्या सुमारास तिसऱ्या अभंग आरतीसाठी काही वेळ थांबेल. तेथून हा सोहळा वाखरीयेथे दुपारी १२ च्या सुमारास पोहोचेल.



वाखरीत संत भेट, चौथी अभंग आरती होईल. संस्थानच्या वतीने नैवद्यप्रसाद दाखविण्यात येईल.  त्यानंतर हा सोहळा पंढरपूरात सायंकाळी ४ च्या सुमारास पोहोचेल. थोरल्या पादुका येथे पाचवी अभंग आरती होईल. येथून ५ च्या सुमारास नगरप्रदक्षिणा, त्यानंतर पादुका मुक्कामस्थळी नेण्यात येतील. एकादशी १ जुलैला सकाळी ७ ला नगर प्रदक्षिणा, सकाळी ८ च्या सुमारास पादुकांना परंपरेप्रमाणे चंद्रभागा स्नान घालण्यात येईल व पादुका तेथील पुंडलिक महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात येतील. पुंडलिक महाराजांचे दर्शन झाल्यानंतर पादुका वैष्णव देवता पांडूरंगाच्या द्वारदर्शनासाठी महाद्वारात नेण्यात येणार आहे. तेथे सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी हा अभंग होईल. यानंतर पादुका श्री संत तुकाराम महाराज मठामध्ये ५ दिवसांसाठी विसावतील. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरा येथे काल्याचे किर्तन व काल्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल. यानंतर पादुका नगरप्रदक्षिणा करून पुन्हा श्री संत तुकाराम महाराजांच्या मठामध्ये नेण्यात येईल व दुपारी ३ च्या सुमारास पादुका दर्शन सोहळा पुन्हा बसने परतीच्या प्रवासाला निघेल.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...