Skip to main content

कोरोना महासंकट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन १५० रूग्णांची नोंद; ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू..!!

कोरोना महासंकट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन १५० रूग्णांची नोंद; ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू..!!



नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १९४१० इतका असून २७ जून रोजी कोरोना विषाणूचे नवीन १५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच आज १११ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले गेलेले आहेत. तर कोरोनामुळे आज ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


नवी मुंबईमध्ये दिवसागणित वाढत असलेली कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच नवी मुंबईत आत्तापर्यंत नवी मुंबईत १९४१० लोकांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १२३३४ जणांचा अहवाल हे निगेटिव्ह आले असून १०७३ जणांचे तपासणीचे अहवाल येणे प्रलंबित आहेत. 


२७ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण:
तुर्भेमधील ०७, बेलापूरमधील १४, कोपरखैरणेमधील २६, नेरुळमधील ३०, वाशीतील ०७, घणसोलीमधील २९, ऐरोलीमधील ३२, दिघ्यातील ०५ असे एकूण १५० नवीन कोरोनारुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 


आत्तापर्यंत नवी मुंबईत ३४०५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ते बरे होऊन घरी परतले आहेत.


२७ जून रोजी कोरोनाचे निगेटिव्ह आलेले रुग्ण : बेलापूरमधील १७, नेरूळमधील १७, वाशीमधील ०२, तुर्भेमधील ०६, कोपरखैरणेमधील ४८, घणसोलीमधील ०४, ऐरोलीमधील १२, दिघा ०५ अशा एकूण १११ व्यक्ती आज कोरोनामुक्त झाल्या असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 


शहरात सद्यस्थितीमध्ये २३९७ व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण २०१ जणांचा कोरोनामुळे दूर्दैवी मृत्यू झाला आहे.


आज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित १५० रुग्ण आढळले: 


नवी मुंबईत एकूण टेस्ट : १९४१०
आज पॉझिटिव्ह रुग्ण : १५०
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : ६००३
एकूण निगेटिव्ह रुग्ण : १२३३४
तपासणी अहवाल प्रलंबित : १०७३
आज बरे होऊन घरी परतलेल्या व्यक्ती : १११
एकूण बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : ३४०५


विभागवार कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या 
बेलापूर : १४
नेरुळ : ३०
वाशी : ०७
तुर्भे : ०७
कोपरखैरणे : २६
घणसोली : २९
ऐरोली : ३२
दिघा : ०५


आज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह नोंदीत एकूण रुग्ण : १११
विभागवार बरे झालेले नागरिक संख्या 
बेलापूर : १७
नेरूळ : १७
वाशी : ०२
तुर्भे : ०६
कोपरखैरणे : ४८
घणसोली : ०४
ऐरोली : १२
दिघा : ०५



 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...